शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

पाण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

By admin | Updated: December 15, 2015 00:56 IST

शेतकरी संतप्त : अकाईचीवाडीत वीजपंप बंद केल्याने पिके वाळली

उंडाळे : अकाईचीवाडी, ता. कऱ्हाड येथील पिण्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाझर तलाव व तलावानजिकच्या सर्वच खासगी विहिरींवरील शेती पंप बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने खासगी विहिरींवरील शेतकऱ्यांनी एक किंंवा दोन पाण्यासाठी वीज शेतीपंप सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करावा व पाझर तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा बंद करण्याबाबत अकाईचीवाडी ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत. या सूचनेतून पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठराव करून पाझर तलाव व नजिकच्या खासगी विहिरीतील शेतीपंप तातडीने बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालय, तहसीलदारांना कळविले होते. तहसीलदारांनी तलावातील व तलावानजिकच्या गाव विहिरी वगळता सर्व वीज, शेतीपंप बंद करण्याचा आदेश वीजवितरण कंपनीला दिला. त्यानुसार तलावाजवळील सर्व शेतीपंप बंद करण्यात आले. त्यामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती करून एक किंंवा दोन पाणी देण्यासाठी फक्त तलावानजिकच्या खासगी विहिरींवरील शेतीपंप सुरू करण्याची विनंती केली. पाणी टंचाई लक्षात घेता सर्वच शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत, तहसीलदार व वीजवितरण कंपनीच्या आडमूठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा ऊस वाळू लागला आहे. ऊसतोडी मिळण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याने अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) माझ्या मालकीच्या खासगी विहिरीवर दोन एकर ऊस असून, माझी विहिर तलावापासून २०० फुटावर आहे, तर गाव विहिरीपासून दोन हजार फुटावर आहे. असे असताना वीजपंप बंद केल्याने माझा संपूर्ण ऊस वाळला आहे. उसाला एक किंवा दोन वेळा पाणी मिळाले असते तर माझे हे नुकसान टळले असते.- लालासाहेब वडकर, शेतकरी