शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

By admin | Updated: December 15, 2015 00:56 IST

शेतकरी संतप्त : अकाईचीवाडीत वीजपंप बंद केल्याने पिके वाळली

उंडाळे : अकाईचीवाडी, ता. कऱ्हाड येथील पिण्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाझर तलाव व तलावानजिकच्या सर्वच खासगी विहिरींवरील शेती पंप बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने खासगी विहिरींवरील शेतकऱ्यांनी एक किंंवा दोन पाण्यासाठी वीज शेतीपंप सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करावा व पाझर तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा बंद करण्याबाबत अकाईचीवाडी ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत. या सूचनेतून पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठराव करून पाझर तलाव व नजिकच्या खासगी विहिरीतील शेतीपंप तातडीने बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालय, तहसीलदारांना कळविले होते. तहसीलदारांनी तलावातील व तलावानजिकच्या गाव विहिरी वगळता सर्व वीज, शेतीपंप बंद करण्याचा आदेश वीजवितरण कंपनीला दिला. त्यानुसार तलावाजवळील सर्व शेतीपंप बंद करण्यात आले. त्यामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती करून एक किंंवा दोन पाणी देण्यासाठी फक्त तलावानजिकच्या खासगी विहिरींवरील शेतीपंप सुरू करण्याची विनंती केली. पाणी टंचाई लक्षात घेता सर्वच शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत, तहसीलदार व वीजवितरण कंपनीच्या आडमूठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा ऊस वाळू लागला आहे. ऊसतोडी मिळण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याने अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) माझ्या मालकीच्या खासगी विहिरीवर दोन एकर ऊस असून, माझी विहिर तलावापासून २०० फुटावर आहे, तर गाव विहिरीपासून दोन हजार फुटावर आहे. असे असताना वीजपंप बंद केल्याने माझा संपूर्ण ऊस वाळला आहे. उसाला एक किंवा दोन वेळा पाणी मिळाले असते तर माझे हे नुकसान टळले असते.- लालासाहेब वडकर, शेतकरी