शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पतंग काटली; कपबशी खणखणली!

By admin | Updated: August 25, 2015 23:04 IST

पाटण बाजार समिती निवडणूक : ‘पाटणकर’गटाला शह देण्याचे ‘देसार्इं’चे सर्व प्रयत्न अयशस्वी

अरूण पवार- पाटण -पाटण बाजार समितीच्या निवडणूक निकालामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. बाजार समितीत सत्तांतर होणार नाही हे सत्ताधाऱ्यांच्यासह आमदार शंभूराज देसार्इंना देखील ज्ञात होते. तरीसुद्धा आमदार झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बलावर बाजार समितीत हात घालायला काय हकरत? या विश्वासाच्या जोरावर आमदार शंभूराज देसार्इंनी निवडणूक लढविली. पाटणकर पिता-पुत्रांनी विधानसभेत काय घडलं बिघडलं हा विषय बाजूला ठेवून बाजार समितीची निवडणूक मनावर घेतली आणि मनावर घेतल्यावर काय होऊ शकते याची प्रचिती आली. त्यामुळे मोठ्या लाटेवर स्वार झालेल्या शंभूराज देसार्इंची पतंग या निमित्तानं का होईना जमिनीवर आली नव्हे तर ती काटली गेली व पाटणकरांच्या कपबशीतील चहा एकदमच लज्जतदार ठरला.जशी देसाई साखर कारखान्यावर देसाई घराण्याची मजबूत पकड आहे तशीच माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांची तालुक्याच्या सहकारात आहे. येथे विधानसभा निवडणुकीचे निकष लागू होत नाही, तर जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपल्या तालुक्यातील संस्थेवर जर दुसराच कोणी चाल करून येत असेल तर मग दोन्ही नेते सर्व शक्तीनिशी जागे होतात. अशीच गत पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाली. विधानसभेत १८८२४ मतांच्या लक्षणीय आघाडीमुळे हुरळून गेलेल्या विद्यमान आमदारांनी पाटण बाजार समितीसाठी अस्त्र बाहेर काढले.यामागेही बाजार समितीच्या निवडणुका देसाई-पाटणकर गटात झाल्या होत्या. मात्र, यावेळेची लढाई वेगळीच होती. सत्ता येणार नाही याची पूर्ण खात्री आमदारांना होती पण ‘लढेंगे तो जितेंगे’ म्हणूनच कार्यकर्ते कामाला लागले. मग माजी आमदार गप्प बसतील तर नवलंच. २६ वर्षे सलग आमदारकी ताब्यात ठेवणारे विक्रमसिंह पाटणकर मूरब्बी नेते म्हणून ओळखले जातात. देसार्इंचा बाजार समितीत शिरकाव झाला तर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील. या भावनेतून पाटणकर पिता-पूत्र जोमाने कामाला लागले. समितीच्या परिणामामुळे पाटणकरांना पुढील आमदारकीसाठी चालना मिळाली आहे.घोषणा फायद्याची ठरलीपाटण बाजार समितीसाठी सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत, शेतकऱ्यांशी निगडित मतदारसंघाचा समावेश होता, हीच नाडी ओळखून विक्रमसिंह पाटणकर यांनी नव्या साखर प्रकल्पाची घोषणा बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्याने ही घोषणा फायद्याची ठरली.देसाई गटात नेत्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचा नाहीबाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी संचालक, अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि व्यापारी यांचा समावेश होता. त्यामुळे अशा निवडक मतदारांपर्यंत पोहोचायचे म्हटल्यास देसाई गटाच्या कार्यकर्त्यांना ते शक्य झाले नाही.