शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किसन वीर समाज, देशासाठी जगले

By admin | Updated: December 28, 2015 00:51 IST

संभाजीराव पाटणे : भुर्इंज कारखाना कार्यस्थळावर स्मृतिदिन कार्यक्रम

भुर्इंज : ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाज आणि देशभक्तीने प्रेरित होऊन थोर स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ते समाज, देशासाठी जगले म्हणूनच ते महापुरुष ठरले. त्यामुळे त्यांच्यासारखी माणसं ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे यांनी केले.किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आबासाहेब वीर यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त कारखान्याच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.प्रा. पाटणे म्हणाले, ‘क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण व तत्कालीन सहकाऱ्यांच्या मदतीने सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करताना किसन वीरांनी आंदोलने, सत्याग्रहे, जेल फोडणे अशा धाडसी कृत्यातून इंग्रजांना हा देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी किसन वीरांनी दिलेले योगदान देशकधीही विसरू शकणार नाही. या वाटचालीत यशवंतराव चव्हाण यांची मोलाची साथ लाभली, पुढे या दोघांमध्ये निर्माण झालेली मैत्रीआणि ऋणानुबंध जिल्ह्यासह राज्याने अनुभवली. त्यांच्यासारखी माणसे ही देशाची सन्मानप्रतीके आहेत,’ असे नमूद करून प्रा. पाटणे यांनी यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या मैत्रीचा आणि स्वातंत्रपूर्व काळातील त्यांच्या कामगिरीचा गौरवाने उल्लेख केला. प्रा. वसंतराव जगताप, संचालक भगवानराव आवडे यांनीही किसन वीर यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीला प्रा. संभाजीराव पाटणे यांच्यासह मान्यवरांनी आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. उपाध्यक्ष गजानन बाबरयांनी स्वागत केले. संचालक नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक सीए सी. व्ही. काळे, चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, प्रताप यादव, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, भगवानराव आवडे, विजया साबळे, आशा फाळके, प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, प्रा. वसंतराव जगताप, शंकरराव पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)