शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रयतेचा राजा मंत्रिपदी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

युगपुरूष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला राकट व करारी बाण्याचे असले तरी, मनाने ...

युगपुरूष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याचा थेट वारसा लाभलेले उदयनराजे दिसायला राकट व करारी बाण्याचे असले तरी, मनाने मात्र, कमालीचे हळवे आहेत, हे त्यांच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींशिवाय फार कमी लोकांना माहीत आहे. सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास ते पाहू शकत नाहीत. सामान्य लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला महाराजसाहेबांनी नेहमीच पहिले प्राधान्य दिले आहे. प्रश्नांची सोडवणूक करताना प्रसंगी त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकांच्या प्रश्नात आडव्या येणाऱ्या अपप्रवृत्तींना उदयनराजे भोसले त्यांच्या स्टाईलने उत्तर देतात.

प्रश्न समोर आल्यानंतर त्याची सोडवणूक होईपर्यंत ते गप्प बसत नाहीत, हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकही जाणतो. गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेताना हा माणूस कमालीचा हळवा होतो. डोळे भरून आलेला त्यांचा चेहरा अनेकांनी हृदयसिंहासनावर जपून ठेवला आहे. जनतेच्या सुख-दु:खाशी एकरूप होताना व्यक्तिगत अडचणींचे त्यांनी कधीच भांडवल केले नाही. उलट लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तन, मन व धन अर्पण करण्यास त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपरंपार माया आहे.

हा राजा जनतेशी एकरूप असल्यानेच राजकारणातील धुरंधर नेत्यांना जलमंदिर कायमच आपलेसे वाटत आले आहे. येथे भेट देणाऱ्या राजकीय क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान हे त्याचे उदाहरण असते. तोच विश्‍वास येथे येणाऱ्या गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या चेहऱ्यावरही दिसतो. म्हणून जलमंदिरवर येणाऱ्या बलाढ्य आणि धनाढ्यांच्या अगोदर गोरगरिबांना प्राधान्य मिळते.

उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्वच राजबिंडे असले तरी, त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही. स्वत: राजे असूनही सर्वांना सर्वकाही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. स्वत:च्या अंगावर गुंजभरही सोनं न घालणारा हा राजा म्हणूनच जनतेचा लाडका आहे. तरी त्याला दरडावून जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी ते आकस ठेवत नाहीत. म्हणूनच काही कारणाने विरोधात गेलेल्याला महाराजसाहेब पुन्हा आसरा देतात. व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा त्याच्या प्रवृत्तीचा द्वेष केला पाहिजे, या विचारांचे असलेले उदयनराजे म्हणूनच सहसा कोणालाही अंतर देत नाहीत. पत्थराला पाझर फोडेल, असे कर्तृत्व गाजवून उदयनराजेंनी आपली हुकूमत सिद्ध करून दाखवली आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा, गोरगरीब जनतेसाठी राजेपद विसरून जाणारा, समाजकारणासाठी दिंड्या-पताका हातात घेणारा, रस्त्यावरील मातीत फाटक्या कपड्यांत मुलांमध्ये मिसळून जाणारा हा राजा लोककल्याणकारी आहे. ज्यावेळी कोणतीही अन्यायी घटना घडते, त्यावेळी ती दूर करण्यासाठी जनतेच्या मुखातून एकच नाव येते, ते म्हणजे फक्त उदयनराजे.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी कायमच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या राजकारण, समाजकारणाचा सर्वसामान्य माणूस केद्रबिंदू मानला आहे. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, ही भूमिका जपणाऱ्या उदयनराजेंनी स्वार्थ न पाहता सर्वसामान्यांचे हितच जोपासण्याचे काम केले. एखाद्या धनिकापेक्षा गोरगरिबाला मदत करणे ही त्यांची विचारधारा आहे. हीच त्यांची विचारधारा महाराष्ट्रासोबत देशभर पोहोचण्याची आवश्यकता आहे. लोककल्याणासाठी कार्य करणाऱ्या या राजाला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद द्यावे. त्यांना मंत्रीपद देऊन तमाम हिंदूंचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशजांचा पर्यायाने महाराष्ट्राचा सन्मान करावा, हीच जनसामान्यांची इच्छा आई जगदंबेने पूर्णत्वास न्यावी, याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा...

- सुनील काटकर

माजी शिक्षण व अर्थ सभापती

जिल्हा परिषद सातारा.