शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

By admin | Updated: April 1, 2015 00:06 IST

उज्ज्वल ऐतिहासिक वारसा : चालुक्य, शीलाहार, देवगिरीच्या यादवांनी माणदेशावर केले राज्य --नावामागची कहाणी-तेवीस

सचिन मंगरूळे - म्हसवड  दक्षिण हिंदुस्थानात प्राचीन काळी राष्ट्रकुटाची घराणी अनेक ठिकाणी राज्य करीत होती. त्यापैकी या घराण्यातील राजा मानाड्.क याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती ‘मानपूरनगरी’. सध्या राजेवाडी तलावाच्या पाणलोटात ही नगरी स्थिरावली आहे. मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता. याच राजाच्या नावावरून ‘देवापूर’ असे नाव मिळाले, असे ऐतिहासिक संदर्भ देऊन ‘देवापूर’च्या नावामागची कहाणी सांगितली जाते. राष्ट्रकुट राज्याचा संस्थापक मानाड्.क हा प्रसिद्ध राजा प्रसिद्ध होऊन गेला. त्याचे राज्य कुंतल देशात पसरले होते. (सध्याचे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे). त्याची राजधानी मानपूर ही म्हसवडच्या आग्नेयेस पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होती. बावीस बिघ्यांची व बावीस पुरुष उंच बळकट गढी होती. आतमध्ये मोठे वाडे होते. गढीभोवती खंदक होता. त्यातून माण नदीचे पाणी खेळविले होते. हत्ती, उंट, घोड्यांचा येथे बाजार भरत असे. ही गढी ११८७२ ते १८७८ मध्ये इंग्रज राजवटीत राणी व्हिक्टोरियाने बांधलेल्या स्थिरावली. कंधार (जि. नांदेड) येथील राष्ट्रकुटाची गढी २५ एकराची आहे. ही मानपूरच्या गढीची जुळी बहीण होती. मानपूरपासून दोन मैलावर महादेवाचे मंदिर होते. ते आजही अस्तित्वात आहे. मात्र, देवापूर हे गाव राजेवाडी तलावाच्या पश्चिमेस वसले आहे. गावची लोकसंख्या तीन हजार आहे.मानाड्.क राजाने इ. स. ३७५ च्या दरम्यान राज्य केले. कुंतल देशाची राजधानी मानपूरनगरी येथे होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देवापूर गावाजवळ सध्याच्या राजेवाडी तलावात हे गाव बुडाले. देवराज राजानंतर त्यांचा पनतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. देवापूरनगरीच्या जवळ पश्चिमेस महादेव मंदिर असून मंदिरात भव्य असा देखणा नंदी आहे. मंदिराशेजारी मोठी बारव असून शेषयानी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. त्यावर अप्सरा आहेत. त्यास ‘नांगरतास’ असे संबोधले जाते. मानपूरनगरीचे अवषेश आजही अस्तित्वातमाण तालुक्यातील देवापूरजवळ मानपूरनगरीचे भग्नावषेश आजही पाहायला मिळतात. औरंगजेबाचा खवासपूर येथे तळ असताना मोघलांनी मंदिराची तोडफोड केली. येथून नऊ मैल अंतरावर खवासपूर आहे. माणदेश दंडकारण्याचा भागमाणदेश दंडकारण्याचा भाग होता. रामायण, महाभारतकालीन काही संदर्भ या भागात आढळतात. विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य याने आपला राजकवी कालिदास याला समकालीन राष्ट्रकुट राज्याच्या दरबारी दूत म्हणून पाठविले होते. त्यावेळी मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता.