शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

मानपूरनगरीचा राजा देवराजचे ‘देवापूर’

By admin | Updated: April 1, 2015 00:06 IST

उज्ज्वल ऐतिहासिक वारसा : चालुक्य, शीलाहार, देवगिरीच्या यादवांनी माणदेशावर केले राज्य --नावामागची कहाणी-तेवीस

सचिन मंगरूळे - म्हसवड  दक्षिण हिंदुस्थानात प्राचीन काळी राष्ट्रकुटाची घराणी अनेक ठिकाणी राज्य करीत होती. त्यापैकी या घराण्यातील राजा मानाड्.क याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती ‘मानपूरनगरी’. सध्या राजेवाडी तलावाच्या पाणलोटात ही नगरी स्थिरावली आहे. मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता. याच राजाच्या नावावरून ‘देवापूर’ असे नाव मिळाले, असे ऐतिहासिक संदर्भ देऊन ‘देवापूर’च्या नावामागची कहाणी सांगितली जाते. राष्ट्रकुट राज्याचा संस्थापक मानाड्.क हा प्रसिद्ध राजा प्रसिद्ध होऊन गेला. त्याचे राज्य कुंतल देशात पसरले होते. (सध्याचे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे). त्याची राजधानी मानपूर ही म्हसवडच्या आग्नेयेस पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होती. बावीस बिघ्यांची व बावीस पुरुष उंच बळकट गढी होती. आतमध्ये मोठे वाडे होते. गढीभोवती खंदक होता. त्यातून माण नदीचे पाणी खेळविले होते. हत्ती, उंट, घोड्यांचा येथे बाजार भरत असे. ही गढी ११८७२ ते १८७८ मध्ये इंग्रज राजवटीत राणी व्हिक्टोरियाने बांधलेल्या स्थिरावली. कंधार (जि. नांदेड) येथील राष्ट्रकुटाची गढी २५ एकराची आहे. ही मानपूरच्या गढीची जुळी बहीण होती. मानपूरपासून दोन मैलावर महादेवाचे मंदिर होते. ते आजही अस्तित्वात आहे. मात्र, देवापूर हे गाव राजेवाडी तलावाच्या पश्चिमेस वसले आहे. गावची लोकसंख्या तीन हजार आहे.मानाड्.क राजाने इ. स. ३७५ च्या दरम्यान राज्य केले. कुंतल देशाची राजधानी मानपूरनगरी येथे होती. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात देवापूर गावाजवळ सध्याच्या राजेवाडी तलावात हे गाव बुडाले. देवराज राजानंतर त्यांचा पनतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. देवापूरनगरीच्या जवळ पश्चिमेस महादेव मंदिर असून मंदिरात भव्य असा देखणा नंदी आहे. मंदिराशेजारी मोठी बारव असून शेषयानी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. त्यावर अप्सरा आहेत. त्यास ‘नांगरतास’ असे संबोधले जाते. मानपूरनगरीचे अवषेश आजही अस्तित्वातमाण तालुक्यातील देवापूरजवळ मानपूरनगरीचे भग्नावषेश आजही पाहायला मिळतात. औरंगजेबाचा खवासपूर येथे तळ असताना मोघलांनी मंदिराची तोडफोड केली. येथून नऊ मैल अंतरावर खवासपूर आहे. माणदेश दंडकारण्याचा भागमाणदेश दंडकारण्याचा भाग होता. रामायण, महाभारतकालीन काही संदर्भ या भागात आढळतात. विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य याने आपला राजकवी कालिदास याला समकालीन राष्ट्रकुट राज्याच्या दरबारी दूत म्हणून पाठविले होते. त्यावेळी मानाड्.क राजाचा पुत्र देवराज राज्य करीत होता.