शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

साडेसात लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

By admin | Updated: March 13, 2017 23:27 IST

अभयचीवाडीतील घटना; सहा दिवसांपासून तरुण गायब; पत्नीची फिर्याद, दोघांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचे अपहरण केले. याबाबत अपहृत तरुणाच्या पत्नीने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुण्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय बळवंत सुर्वे (वय २८, रा. अभयचीवाडी, ता. कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभयचीवाडी येथील संजय सुर्वे हा तरुण शेती करतो. ८ मार्चला संजय व त्याची पत्नी पूनम हे दोघे घरी असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्या घरी आले. संजय त्या दोघांनाही ओळखत होता. त्याने त्या दोघांना घरामध्ये घेऊन पत्नी पूनम हिला चहा बनविण्यास सांगितला. पूनम चहा घेऊन आल्यानंतर संजयने त्या दोघांची ओळख करून दिली. एकाचे नाव ऋषिकेश भंडारी, तर दुसऱ्याचे नाव सागर असल्याचे संजयने पूनमला सांगितले. चहा दिल्यानंतर पूनम घरात गेली. काही वेळानंतर त्या दोघांनी संजयला ‘आम्हाला स्टॅण्डवर सोडून ये,’ असे सांगितले. त्यानुसार संजय त्याची दुचाकी (एमएच ५० वाय ३४४) घेऊन त्या दोघांसमवेत घरातून बाहेर पडला. ‘या दोघांना स्टॅण्डवर सोडून मी लगेच परत येतो,’ असे त्याने पूनमला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे पूनमने त्याच्या मोबाईलवर फोन केला. मात्र, तो बंद होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूनमने संजयची विवाहित बहीण सुलोचना यांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. ‘त्यावर आपण उद्यापर्यंत वाट बघू,’ असे सुलोचना यांनी पूनमला सुचविले. त्यामुळे पूनम जेवण करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संजयची बहीण अभयचीवाडी येथे आली. संजयच्या मोबाईलवरून कोणी तरी माझ्या मोबाईलवर फोन केला होता. ‘पाच लाख २४ हजार रुपयांची जुळणी करून ठेवा नाहीतर तुम्हाला जड जाईल. तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे,’ अशी त्या व्यक्तीने मला धमकी दिल्याचे