शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वाढदिनी दुष्काळग्रस्तांना खाऊचा वाटा!

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

‘अभिनव’ उपक्रम : ‘लोकमत बालविकास मंच’चा सदस्य बोभाटेने दिले पैसे -- गूड न्यूज

जगदीश कोष्टी --- सातारा ‘दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा,’ अशी चळवळ ‘लोकमत’ सुरू करताच अनेकजण या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे आहेत. साताऱ्यातील अभिनव बोभाटे या चौथीतील मुलाने खारीचा वाटा उचलला आहे. अभिनवने वाढदिवसाला खाऊसाठी म्हणून आलेली रक्कम दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. ही रक्कम निवासी जिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे प्रदान केली.‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेणाऱ्यांने घेता-घेता देणाऱ्याचे हात घ्यावे,’ असं म्हटलं जातं. निसर्गाची चक्र फिरल्यामुळे राज्यावर बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग जमायला लागले आहेत. त्यामुळे अन्नदाता अडचणीत आला आहे. पाऊस पडेल, या आशेवर त्याने पेरण्याही केल्या; मात्र पावसाअभावी पेरण्या वाया गेल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीसाठी ‘बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर’ ही मोहीम सुरू केली. शेकडो गणेश मंडळे पुढे सरसावली आहेत. डॉल्बीसह इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मदत केली आहे. याच संस्कारातून घडलेला साताऱ्यातील अभिनव बोभाटे या मुलाने वाढदिवसाला खाऊसाठी आलेला पैसादुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला. अभिनव हा साताऱ्यातील प्राथमिक सैनिक स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत आहे. मंगळवार, दि. १ सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करत असताना शेजार-पाजारचे, नातेवाईक खाऊसाठी पैसे देत होते. हे पैसे अभिनवने न खर्च करता दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे धरला. चिमुकल्याचा हा हट्ट पूर्ण करत अभिनवला घेऊन त्याचे आई-वडील दोघेही बुधवार, दि. १६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी येताना पाचशे रुपयांचा धनादेश व एक पत्र आणले होते. पाचशे रुपयांचा धनादेश निवासी जिल्हाधिकारी संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. तेथून बाहेर आल्यानंतर या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. ‘लोकमत’कडून प्रेरणा--अभिनव बोभाटे याचे वडील बापूसाहेब हे ग्रामसेवक असून ते अपंग साहित्य संमेलन भरवत असतात. अभिनव हा ‘लोकमत’चा वाचक असून तो बालविकास मंचचा सदस्य आहे. ‘लोकमत’ने सुरु केलेल्या मोहिमेमुळे पेरित झालेल्या अभिनवने वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. कपडे, केक, मित्रांना पार्टी देण्यासाठी केला जात असलेल्या खर्चात कपात करुन पाचशे रुपयांची मदत दुष्काळग्रस्तांसाठी दिली आहे.अभिनव बोभाटे हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याने दिलेली मदत लाख मोलाची आहे. वाढदिवसाला जमा झालेली रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी, असं वाटणंच महत्त्वाचे आहे. - संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी