शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:34 IST

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील गावांतशिवार पुन्हा फुलल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात पाणीनीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावनी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावामध्ये व परिसरात पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागली होती, त्यामुळे मोर्वे येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा- देवधर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.

खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आलेली होती, या मागणीनुसार नीरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगष्ट पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा- देवघर, भाटघर या धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डावा व उजवा कालव्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा - देवघरच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने नीरा- देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुकयातील वाघोशी, अंदोरी,कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतक?्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असुन पाण्याअभावी जळु लागलेल्या पिकांना देखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरानी मोठी गर्दी केली होती.मकरंद पाटलांच्या प्रयत्नामुळे काम मार्गीतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोर्वे येथे कालव्यावर तात्पुरता पुल उभारून नीरा -देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले होते, परंतु यावेळी पाणी वाघोशी, कराडवाडी, परिसरात पोहचल्यानंतर लगेचच बंद करण्यात आले होते. मात्र पाणी बंद केल्याने ते अंदोरी गावच्या शिवारात पोहचु शकले नव्हते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती.