शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:34 IST

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील गावांतशिवार पुन्हा फुलल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात पाणीनीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावनी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावामध्ये व परिसरात पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागली होती, त्यामुळे मोर्वे येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा- देवधर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.

खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आलेली होती, या मागणीनुसार नीरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगष्ट पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा- देवघर, भाटघर या धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डावा व उजवा कालव्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा - देवघरच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने नीरा- देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुकयातील वाघोशी, अंदोरी,कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतक?्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असुन पाण्याअभावी जळु लागलेल्या पिकांना देखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरानी मोठी गर्दी केली होती.मकरंद पाटलांच्या प्रयत्नामुळे काम मार्गीतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोर्वे येथे कालव्यावर तात्पुरता पुल उभारून नीरा -देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले होते, परंतु यावेळी पाणी वाघोशी, कराडवाडी, परिसरात पोहचल्यानंतर लगेचच बंद करण्यात आले होते. मात्र पाणी बंद केल्याने ते अंदोरी गावच्या शिवारात पोहचु शकले नव्हते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती.