शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:34 IST

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील गावांतशिवार पुन्हा फुलल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात पाणीनीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावनी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावामध्ये व परिसरात पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागली होती, त्यामुळे मोर्वे येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा- देवधर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.

खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आलेली होती, या मागणीनुसार नीरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगष्ट पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा- देवघर, भाटघर या धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डावा व उजवा कालव्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा - देवघरच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने नीरा- देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुकयातील वाघोशी, अंदोरी,कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतक?्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असुन पाण्याअभावी जळु लागलेल्या पिकांना देखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरानी मोठी गर्दी केली होती.मकरंद पाटलांच्या प्रयत्नामुळे काम मार्गीतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोर्वे येथे कालव्यावर तात्पुरता पुल उभारून नीरा -देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले होते, परंतु यावेळी पाणी वाघोशी, कराडवाडी, परिसरात पोहचल्यानंतर लगेचच बंद करण्यात आले होते. मात्र पाणी बंद केल्याने ते अंदोरी गावच्या शिवारात पोहचु शकले नव्हते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती.