शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात अडखळत खरीपची पेरणी ८१ टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला तरी पूर्वेकडे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला असला तरी पूर्वेकडे अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी रडतखडत सुरू असून, आतापर्यंत ८१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक १०५ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा ६७ हजार हेक्टवर पेरा आहे तर बाजरीची पेरणी अवघी ५७ टक्के आहे. अनेक ठिकाणी पाऊसच झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. या हंगामातील जिल्ह्याचे ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक ६४ हजार हेक्टर आहे तर सोयाबीन ६३,७५४, भात ४९ हजार, भुईमूग ३८,२२७, ज्वारी २४,२०३, मका १८,५९८, नाचणी ५,८८७ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र आहे. गळीतधान्याचे क्षेत्र हे १ लाख ४ हजार हेक्टरवर आहे. ही पिके विविध तालुक्यांत पावसाच्या प्रमाणात घेतली जातात. पूर्व भागात बाजरी हेच प्रमुख पीक राहते. त्याचबरोबर मका, सोयाबीन अन् गळीतधान्ये काही प्रमाणात घेतली जातात. तर पश्चिमेकडे भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांना प्राधान्य दिले जाते.

जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण विसंगत राहिले आहे. पूर्व भागात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला तर मान्सूननेही दमदार हजेरी लावली नाही. आता तर पावसाचा खोळंबा आहे. याचवेळी पश्चिम भागात मागील २० दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता, त्यामुळे पेरण्या सुरू आहेत. काही ठिकाणच्या पेरण्या पूर्णही झाल्या असून, भांगलणीची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पेरणी खोळंबली आहे.

जिल्ह्याचे खरीप हंगामातील एकूण सर्वसाधारण क्षेत्र ऊस वगळून ३ लाख १६ हजार हेक्टरवर असले तरी आतापर्यंत २ लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण टक्केवारीत हे प्रमाण ८०.७९ आहे. आतापर्यंत सातारा तालुक्यात ७५.४१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर जावळीत ६६.४० टक्के, पाटणला ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. कऱ्हाडला ७५ टक्के, कोरेगाव ९०, खटाव ६५, माण १०१, फलटण ८०, खंडाळा ६१, वाई ६६ आणि महाबळेश्वर तालुक्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

..........................................