शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात

By admin | Updated: July 25, 2016 23:42 IST

वाई तालुका : अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग; सोयाबीन, मूग, चवळी, भुईमूग, हळद पिकांना दिलासा

पसरणी : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्या दिवासांत पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या अंतर्गत मशागत चालू आहे. पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे. तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे. पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पाऊल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे केला आहे. त्यावर बळीराजाने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात सोयाबीन, हिरवा मूग, चवळी, भुईमूग, बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान पीक विमा योजना सुरू२०१६ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असून, या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.