शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात

By admin | Updated: July 25, 2016 23:42 IST

वाई तालुका : अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग; सोयाबीन, मूग, चवळी, भुईमूग, हळद पिकांना दिलासा

पसरणी : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्या दिवासांत पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या अंतर्गत मशागत चालू आहे. पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे. तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे. पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पाऊल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे केला आहे. त्यावर बळीराजाने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात सोयाबीन, हिरवा मूग, चवळी, भुईमूग, बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान पीक विमा योजना सुरू२०१६ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असून, या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.