शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात

By admin | Updated: July 25, 2016 23:42 IST

वाई तालुका : अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग; सोयाबीन, मूग, चवळी, भुईमूग, हळद पिकांना दिलासा

पसरणी : वाई तालुक्यात उशिरा पावसाने जरी सुरुवात केली असली तरीही या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडी जोखीम घेतल्याने व धूळफेक पेरणी केल्याने आज पिकांची उगवण चांगली झाली आहे. सध्या खरीप हंगाम चांगलाच जोमात आहे शेतीची अंतर्गत मशागत चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. निसर्गाने साथ न दिल्यास व थोड्या दिवासांत पाऊस पडला नाहीतर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सध्या अंतर्गत मशागत चालू आहे. पाऊस वेळेत न पडल्यास हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. सध्या जरी पावसाने साथ दिली असली तरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत हा तालुका आजही आहे. तालुक्यातील धरणांची पातळी आजही खालावलेली आहे. पावसाचे काही महिने बाकी असले तरीही तालुक्यातील धरणे पूर्ण क्षमतेने न भरल्यास भयानक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच कृषी विभागानेही पुढचे पाऊल टाकत पिकांचा विमा उतरविण्याचा आग्रह शेतकऱ्यांकडे केला आहे. त्यावर बळीराजाने सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात सोयाबीन, हिरवा मूग, चवळी, भुईमूग, बाजरी, हळद, ऊस या सर्व पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान पीक विमा योजना सुरू२०१६ खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली असून, या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना हा विमा उतरवणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.