शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत खरिपाच्या पिकांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या ...

कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिके चांगली आली आहेत. सध्या पिकांचा बहराचा काळ असून पावसाने दडी मारल्याने पिकांच्या पोषणासाठी पावसाचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.

सद्यस्थितीत खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्याच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यांना पावसाची आवश्यकता आहे. पाऊस न झाल्यास पिकांच्या शेंगा भरणार नाहीत. याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामुळे पिके ऐन बहराच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन-तीन दिवसांपासून कडक ऊन पडत असून मे महिन्यासारखा चटका जाणवू लागला आहे. याचा पिकांवर परिणाम होऊन ती कोमेजायला लागली आहेत. यामुळे शेतकरी निराश होऊन पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान झालेले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा शेतीला फटका बसला आहे. अशातच आता उर्वरित भागातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड व इतर कडधान्य पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, पावसानेच उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्याला भीती वाटत आहे.

चौकट :

शेतकऱ्याला पावसाची आस

यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन होऊन शेतकऱ्यांची पेरणी वेळेत झाल्याने खरिपाच्या पिकांना पोषक वातावरण मिळाले. शेतातील पिके चांगली असून शिवार बहरलेले आहे. शेतात सगळीकडे हिरवेगार पीक डोलत असून आता पावसाची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन पडत आहे. यामुळे पिके पिवळी पडून कोमेजायला सुरुवात झाली आहे. पाऊस न झाल्यास याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

फोटो :

जावळी तालुक्यातील शेती शिवारात खरिपाची पिके बहरली असून त्यांना पावसाची नितांत आवश्यकता आहे.