शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जावळीत खरिपाच्या पिकांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या ...

कुडाळ : खरीप हंगामात जावळी तालुक्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिके चांगली आली आहेत. सध्या पिकांचा बहराचा काळ असून पावसाने दडी मारल्याने पिकांच्या पोषणासाठी पावसाचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.

सद्यस्थितीत खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्याच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यांना पावसाची आवश्यकता आहे. पाऊस न झाल्यास पिकांच्या शेंगा भरणार नाहीत. याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामुळे पिके ऐन बहराच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन-तीन दिवसांपासून कडक ऊन पडत असून मे महिन्यासारखा चटका जाणवू लागला आहे. याचा पिकांवर परिणाम होऊन ती कोमेजायला लागली आहेत. यामुळे शेतकरी निराश होऊन पावसाकडे डोळे लावून बसला आहे.

यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान झालेले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा शेतीला फटका बसला आहे. अशातच आता उर्वरित भागातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड व इतर कडधान्य पिकांना आता पावसाची गरज आहे. मात्र, पावसानेच उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्याला भीती वाटत आहे.

चौकट :

शेतकऱ्याला पावसाची आस

यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन होऊन शेतकऱ्यांची पेरणी वेळेत झाल्याने खरिपाच्या पिकांना पोषक वातावरण मिळाले. शेतातील पिके चांगली असून शिवार बहरलेले आहे. शेतात सगळीकडे हिरवेगार पीक डोलत असून आता पावसाची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन पडत आहे. यामुळे पिके पिवळी पडून कोमेजायला सुरुवात झाली आहे. पाऊस न झाल्यास याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

फोटो :

जावळी तालुक्यातील शेती शिवारात खरिपाची पिके बहरली असून त्यांना पावसाची नितांत आवश्यकता आहे.