शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यातील ३६ हजार सातबारा उतारे कोरे!

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

पुनर्वसनाचा शिक्का काढला: पाणीटंचाई आढावा बैठकीत मकरंद पाटील यांच्या इतरही सूचना

खंडाळा : खंडाळा तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याअभावी पिकांची परिस्थिती गंभीर आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी सध्या तालुक्यात पोहोचले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी जाणवत नाही; परंतु जानेवारीनंतरही पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. गावोगावी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करून घ्यावा,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. दरम्यान, यावेळी ३६ हजार सातबारा उताऱ्यांवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही झाले.खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती रमेश धायगुडे, उपसभापती सारिका माने, सदस्य दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, गटविकास अधिकार विलास साबळे, चंद्रशेखर म्हेत्रे आदी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, ‘तालुक्यात टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने केला पाहिजे. यावर्षी पाऊस कमी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील धोका टळण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे. धोम-बलकवडीचे पाणी शिवारात पोहोचले नसते तर बिकट परिस्थती उद्भवली असती. यापुढे खंडाळ्याच्या हक्काचे पाणी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. गावोगावच्या पाणी स्त्रोताचे सर्वेक्षण करून ठेवावे. टंचाईच्या काळात कोणाचीही वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नयेत. इंधन विहिरींची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा. यासाठीच्या उपाययोजना आतापासून करण्याची गरज आहे.तालुक्यातील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सध्याच्या पाणी परिस्थतीचा आढावा घेण्यात आला. सरपंचांच्या मागणीनुसार सर्वेक्षण नियोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी मांगले यांनी पीक परिस्थितीचा आढावा दिला. बाजरीचे पीक वगळता अन्य पिकांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे धान्याचेही नियोजन करणे गरजेचे आहे.’यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती मोठी होती. तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी) तिसरा टप्प्याला विरोध...खंडाळा तालुक्यातील खंडाळा, शिवाजीनगर, मोर्वे, हरळी, अहिरे, बावडा, म्हावशी या गावातून होणाऱ्या एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन केले जाऊ नये, बागायती जमिनी घेतल्या जाणार नाहीत. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी परखड भूमिका घेतली. त्याचबरोबर तालुक्यतील ३६ हजार सातबाराच्या उताऱ्यावरील पूनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही करण्यात आले.