शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खंडाळ्यातील ३६ हजार सातबारा उतारे कोरे!

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

पुनर्वसनाचा शिक्का काढला: पाणीटंचाई आढावा बैठकीत मकरंद पाटील यांच्या इतरही सूचना

खंडाळा : खंडाळा तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाण्याअभावी पिकांची परिस्थिती गंभीर आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी सध्या तालुक्यात पोहोचले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सध्यातरी जाणवत नाही; परंतु जानेवारीनंतरही पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. गावोगावी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करून घ्यावा,’ असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. दरम्यान, यावेळी ३६ हजार सातबारा उताऱ्यांवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही झाले.खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती रमेश धायगुडे, उपसभापती सारिका माने, सदस्य दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, गटविकास अधिकार विलास साबळे, चंद्रशेखर म्हेत्रे आदी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, ‘तालुक्यात टंचाई जाणवत नसली तरी उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने केला पाहिजे. यावर्षी पाऊस कमी असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील धोका टळण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे. धोम-बलकवडीचे पाणी शिवारात पोहोचले नसते तर बिकट परिस्थती उद्भवली असती. यापुढे खंडाळ्याच्या हक्काचे पाणी देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. गावोगावच्या पाणी स्त्रोताचे सर्वेक्षण करून ठेवावे. टंचाईच्या काळात कोणाचीही वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नयेत. इंधन विहिरींची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा. यासाठीच्या उपाययोजना आतापासून करण्याची गरज आहे.तालुक्यातील सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सध्याच्या पाणी परिस्थतीचा आढावा घेण्यात आला. सरपंचांच्या मागणीनुसार सर्वेक्षण नियोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी मांगले यांनी पीक परिस्थितीचा आढावा दिला. बाजरीचे पीक वगळता अन्य पिकांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे धान्याचेही नियोजन करणे गरजेचे आहे.’यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती मोठी होती. तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी) तिसरा टप्प्याला विरोध...खंडाळा तालुक्यातील खंडाळा, शिवाजीनगर, मोर्वे, हरळी, अहिरे, बावडा, म्हावशी या गावातून होणाऱ्या एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन केले जाऊ नये, बागायती जमिनी घेतल्या जाणार नाहीत. यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी परखड भूमिका घेतली. त्याचबरोबर तालुक्यतील ३६ हजार सातबाराच्या उताऱ्यावरील पूनर्वसनाचे शिक्के काढण्यात आले. त्याचे वाटपही करण्यात आले.