शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

खंडकरी शेतकरी जमिनीसाठी न्यायाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : शेती महामंडळाकडील खंडकरी शेतकऱ्यांच्या खंडाने घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी जनआंदोलन झाले. त्यावर तत्कालीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : शेती महामंडळाकडील खंडकरी शेतकऱ्यांच्या खंडाने घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी जनआंदोलन झाले. त्यावर तत्कालीन राज्य सरकारने रामराजे नाईक-निंबाळकर समिती नेमली. त्यांनी केलेल्या शिफारसीनुसार खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावला. खंडकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्या परंतु फलटण तालुक्यातील रावडी ते राजाळे शेती महामंडळाच्या मळ्यावरील कामगार अजूनही घरासाठी जागा मिळण्याच्या अपेक्षेने न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार २००९मध्ये माढा लोकसभा मतदार संघात उभे राहिले. त्यावेळी साखरवाडीत झालेल्या सभेत त्यांनी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेऊन लवकरच कामगारांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना राहण्यासाठी त्या-त्या ठिकाणी कायमस्वरूपी पक्की घरे बांधण्यासाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, अजून तरी हा प्रश्न प्रलंबितच राहिल्याने महामंडळाच्या कामगारांना न्यायाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. पवार यांनी शेती महामंडळाच्या कामगारांना त्यावेळी आश्वासनांच्या माध्यमातून ताकद दिली खरी, परंतु अजूनही खरा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

कामगारांना पक्की घरे, जागा कधी मिळणार हा प्रश्न आहे. ज्या कामगारांनी संपूर्ण आयुष्य महामंडळात कष्ट करून घालवले, तेच कामगार जीवनाच्या अंतिम टप्प्यात आयुष्य जगत असताना येणाऱ्या पुढील पिढीला तरी याचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेती महामंडळाच्या कामगारांना दोन गुंठे जागा व कसण्यासाठी जमीन अशा मागण्या औरंगाबाद खंडपीठात अजूनही पडून आहेत. सरकार याकडे लक्ष देत नाही. मध्यंतरीच्या काळात राज्यात भाजपचे सरकार आले. त्यांच्याकडून तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. आता आघाडी सरकार आले तरी हा प्रश्न प्रलंबितच आहे.

शेती महामंडळाच्या लोकवस्त्या अजूनही गावठाणात मोडत नसल्याने त्यांना शासनाच्या घरकुल व इतर सुविधांचा लाभ घेता येत नसल्याने वंचितच राहावे लागत आहे. घरकुलासाठी पात्र लाभार्थींना याचा लाभ घेता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायतीला या जागेवर विकासाच्या योजना राबविताना अडचणी निर्माण होत आहेत.

चौकट :

घरे रिकामी करण्यासाठी धमक्या

अनेक पिढ्या महामंडळाच्या जागेवर होऊन जात असताना ‘कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर’ हा पूर्वीपासून नियम असूनही शेती महामंडळाच्या कामगारांना वरिष्ठ पातळीवर अजूनही घरे खाली करण्यासाठी धमक्यांचे पत्र येत आहेत. त्यांना जागा खाली करण्याकरिता नोटीस काढल्या जातात. परंतु कामगार या धमक्यांना भीक घालत नाहीत. शेती महामंडळाचे कामगार युनियन प्रतिनिधी या प्रश्नासाठी हेलपाटे घालून अनेक ठिकाणांच्या लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवत आहेत. न्यायालयाच्या वाऱ्या पोटाला चिमटा घेऊन करत असताना कामगार प्रतिनिधींनी न्यायाच्या भूमिकासाठी आपले आयुष्य घालवले परंतु २०२१मध्येही न्याय मिळत नाही, याची खंत जिव्हारी लागली आहे.

चौकट

शेती महामंडळांच्या कामगारांना दोन गुंठे जागा मिळावी, यासाठी आवाज उठवला आहे. अद्यापही त्यासाठी शासनाकडे प्रयत्न सुरू असून, लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही भेट घेऊन जागेचा मुद्दा मांडणार आहे.

- डी. के. पवार

माजी अध्यक्ष, शेती महामंडळ.