शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

खामजाई मंदिर, खामटाके नामशेष होणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

खंबाटकी घाट रुंदीकरण : ऐतिहासिक ठेवा वाचविण्याची ग्रामस्थांची मागणी

खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारादरम्यान खंबाटकी घाटाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या घाटातील ऐतिहासिक खामजाई मंदिर आणि ‘खामटाके’ हा पाण्याचा नैसर्गिक झरा नामशेष होणार असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात येत आहे. याच ठिकाणाहून शिवकालीन राजमार्ग असल्यामुळे घाटाच्या रुंदीकरणावेळी हा ऐतिहासिक ठेवा वाचविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे खंबाटकी घाटरस्त्याचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. घाटाच्या मध्यभागी रस्त्यालगत असलेले खामजाई देवीचे मंदिर आणि खामटाके काढण्यात येणार आहे. याबाबतची लेखी सूचना भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराचे पुजारी संजय गोसावी यांना दिली आहे. वास्तविक, शिवकालापासूनच खंडाळा हे गाव घाटाच्या पायथ्याशी होते. तेव्हापासूनच हे खामजाई देवीचे मंदिर आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी मोठे टाके खोदण्यात आले होते. त्याला ‘खामटाके’ असे संबोधण्यात येते. वर्षभर या टाक्यातून थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होते. परंतु रस्ता रुंदीकरणाची कुऱ्हाड मंदिरावर आणि ऐतिहासिक वास्तूवर कोसळणार आहे. त्यामुळे गेल्या साडेचारशे वर्षांपासून जपलेला हा ठेवा नष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून खंत व्यक्त केली जात आहे. घाटरस्त्याच्या रुंदीकरणावेळी या वास्तूचा विचार व्हावा, ही मागणी जोर धरू लागली आहे.खंबाटकी घाट आणि खामटाके यांचा जवळचा संबंध आहे. ‘खामटाके’ नावाच्या पाण्याच्या साठ्यावरूनच या घाटाचा नामोल्लेख ‘खामटकी घाट’ व पुढे ‘खंबाटकी घाट’ असा होऊ लागला. त्यामुळे या घाटाच्या नावाचा ऐतिहासिक पुरावाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, घाटातून प्रवास करताना लोकांना थांबण्याचे एक ठिकाणही नाहिसे होणार आहे. त्यामुळे या नोटिशीनंतर होणाऱ्या सर्वेक्षणात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)‘खामटाके’ हा ऐतिहासिक पुरावा आहे. शिवकालीन राजमार्गही येथूनच जात होता. त्यामुळे हा अनमोल ठेवा जपण्यात यावा; अन्यथा शिवप्रेमींना तीव्र भूमिका घ्यावी लागेल.- शेखर खंडागळे, इतिहासप्रेमीखामजाई देवीचे मंदिर शेकडो वर्षांपासून आहे. खंडाळा ग्रामस्थांचे ते श्रद्धास्थान आहे. गावाच्या वतीने देवीचा उत्सवही होतो. घाटाच्या रुंदीकरणात मंदिराला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. ग्रामस्थांच्या भावना जपल्या जाव्यात यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.- किरण खंडागळे, सरपंच, खंडाळा