शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

By admin | Updated: May 23, 2017 23:30 IST

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

लोकमत न्यूज नेटवर्क+कऱ्हाड : पोलिस चोवीस तास ड्यूटीवर असतात; पण या चोवीस तासांच्या ड्यूटीपेक्षा सध्या शेकडो पोलिसांना नव्या ‘टेन्शन’ने घेरलंय. पोलिस ठाण्यात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतायत. याच आठवड्यात त्यातील पहिला टप्पाही पार पडतोय. त्यामुळे बदली कुठे होणार, असा प्रश्न पोलिसांना सतावतोय. जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे ‘गॅझेट’ याच आठवड्यात होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या गॅझेटनुसार शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचे सध्याचं पोलिस स्टेशन सोडून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे. या बदल्या जिल्ह्यांतर्गत असल्या तरी पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाचंही स्थलांतर करावं लागतं. त्यामुळे पोलिसांचे दैनंदिन जीवन काही दिवसांसाठी विस्कळीत होते. दरवर्षी अशाच पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. एका पोलिस ठाण्यातील कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी नेमण्यात येतात. तर तेथील कर्मचाऱ्याला तिसऱ्याच ठाण्यात कर्तव्यावर जावे लागते. वास्तविक, पोलिस ज्याठिकाणी कार्यरत असतो त्याचठिकाणी त्याचे कुटुंब वास्तव्यास असते. कुटुंबाच्या सोयीसाठी संबंधित पोलिसाला सारासार विचार करावा लागतो. मुलांचे शिक्षण, दैनंदिन खरेदी, पाण्याची सोय, वातावरण याचा विचार करूनच पोलिसांना भाडेतत्त्वावर खोली घ्यावे लागते. त्याठिकाणी कुटुंबाला स्थिरस्थावर करावे लागते. मुलांना योग्य शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये हेलपाटे घालून दाखला घ्यावा लागतो. हे करीत असतानाही पोलिसांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे करून पोलिस व त्याचे कुटुंबीय संबंधित ठिकाणी स्थिर होत असताना बदलीचा भुंगा पोलिसांच्या मागे लागतो. रूळावर आलेलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून पोलिसाला दुसरं शहर गाठावं लागतं.सध्या यावर्षीच्या बदल्यांचे गॅझेट काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे अनेक पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. कुटुंबाला स्थलांतरीत करावे लागणार असल्याने काहींनी पॅकिंग करण्यासही सुरुवात केली आहे. कुठे ना कुठे बदली होणार, हे माहीत असल्याने कर्मचाऱ्यांनी तशी मानसिकताही केली आहे. मात्र, बदलीच्या विचाराने कुटुंबीयांची झोप उडाल्याचे दिसते. सध्या साताऱ्यासह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. विशेष पथकातील पोलिसही गॅसवरजिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसह विशेष पथकातील काही पोलिसांचीही यावर्षी बदली होणार आहे. जिल्हा पोलिस दलात मुख्यालय, कंट्रोल रूम, स्थानिक गुन्हे शाखा, बीडीडीएस, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, एमटीएस, वायरलेस, वुमेन सेल, दहशतवाद विरोधी, पोलिस वेलफेअर, सीसीटीएनएस अशी विशेष पथके आहेत. अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदलीपोलिस कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, हवालदार, सहायक फौजदार या पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदे असतात. या कर्मचाऱ्यांची बदली दर पाच वर्षांनी होते. तर फौजदार, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी केल्या जातात.गावाजवळ जावं हीच इच्छाऐच्छिक बदलीच्या अर्जात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मूळ गावानजीकचे पोलिस ठाणे सुचविले आहे. मात्र, पोलिस कर्मचारी ज्या गावातील आहे त्याच गावात शक्यतो त्याची बदली केली जात नाही.पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिली तरच कर्मचाऱ्याला त्याच्या तालुक्यात बदली मिळते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या आपल्या गावाजवळचं पोलिस स्टेशन मिळावं, अशीच अनेक कर्मचाऱ्यांची मनोमन इच्छा आहे.