शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

By admin | Updated: May 23, 2017 23:30 IST

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

लोकमत न्यूज नेटवर्क+कऱ्हाड : पोलिस चोवीस तास ड्यूटीवर असतात; पण या चोवीस तासांच्या ड्यूटीपेक्षा सध्या शेकडो पोलिसांना नव्या ‘टेन्शन’ने घेरलंय. पोलिस ठाण्यात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतायत. याच आठवड्यात त्यातील पहिला टप्पाही पार पडतोय. त्यामुळे बदली कुठे होणार, असा प्रश्न पोलिसांना सतावतोय. जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे ‘गॅझेट’ याच आठवड्यात होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या गॅझेटनुसार शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचे सध्याचं पोलिस स्टेशन सोडून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे. या बदल्या जिल्ह्यांतर्गत असल्या तरी पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाचंही स्थलांतर करावं लागतं. त्यामुळे पोलिसांचे दैनंदिन जीवन काही दिवसांसाठी विस्कळीत होते. दरवर्षी अशाच पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. एका पोलिस ठाण्यातील कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी नेमण्यात येतात. तर तेथील कर्मचाऱ्याला तिसऱ्याच ठाण्यात कर्तव्यावर जावे लागते. वास्तविक, पोलिस ज्याठिकाणी कार्यरत असतो त्याचठिकाणी त्याचे कुटुंब वास्तव्यास असते. कुटुंबाच्या सोयीसाठी संबंधित पोलिसाला सारासार विचार करावा लागतो. मुलांचे शिक्षण, दैनंदिन खरेदी, पाण्याची सोय, वातावरण याचा विचार करूनच पोलिसांना भाडेतत्त्वावर खोली घ्यावे लागते. त्याठिकाणी कुटुंबाला स्थिरस्थावर करावे लागते. मुलांना योग्य शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये हेलपाटे घालून दाखला घ्यावा लागतो. हे करीत असतानाही पोलिसांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे करून पोलिस व त्याचे कुटुंबीय संबंधित ठिकाणी स्थिर होत असताना बदलीचा भुंगा पोलिसांच्या मागे लागतो. रूळावर आलेलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून पोलिसाला दुसरं शहर गाठावं लागतं.सध्या यावर्षीच्या बदल्यांचे गॅझेट काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे अनेक पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. कुटुंबाला स्थलांतरीत करावे लागणार असल्याने काहींनी पॅकिंग करण्यासही सुरुवात केली आहे. कुठे ना कुठे बदली होणार, हे माहीत असल्याने कर्मचाऱ्यांनी तशी मानसिकताही केली आहे. मात्र, बदलीच्या विचाराने कुटुंबीयांची झोप उडाल्याचे दिसते. सध्या साताऱ्यासह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. विशेष पथकातील पोलिसही गॅसवरजिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसह विशेष पथकातील काही पोलिसांचीही यावर्षी बदली होणार आहे. जिल्हा पोलिस दलात मुख्यालय, कंट्रोल रूम, स्थानिक गुन्हे शाखा, बीडीडीएस, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, एमटीएस, वायरलेस, वुमेन सेल, दहशतवाद विरोधी, पोलिस वेलफेअर, सीसीटीएनएस अशी विशेष पथके आहेत. अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदलीपोलिस कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, हवालदार, सहायक फौजदार या पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदे असतात. या कर्मचाऱ्यांची बदली दर पाच वर्षांनी होते. तर फौजदार, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी केल्या जातात.गावाजवळ जावं हीच इच्छाऐच्छिक बदलीच्या अर्जात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मूळ गावानजीकचे पोलिस ठाणे सुचविले आहे. मात्र, पोलिस कर्मचारी ज्या गावातील आहे त्याच गावात शक्यतो त्याची बदली केली जात नाही.पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिली तरच कर्मचाऱ्याला त्याच्या तालुक्यात बदली मिळते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या आपल्या गावाजवळचं पोलिस स्टेशन मिळावं, अशीच अनेक कर्मचाऱ्यांची मनोमन इच्छा आहे.