शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

By admin | Updated: May 23, 2017 23:30 IST

‘खाकी’च्या मागे आता बदलीचा भुंगा !

लोकमत न्यूज नेटवर्क+कऱ्हाड : पोलिस चोवीस तास ड्यूटीवर असतात; पण या चोवीस तासांच्या ड्यूटीपेक्षा सध्या शेकडो पोलिसांना नव्या ‘टेन्शन’ने घेरलंय. पोलिस ठाण्यात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसांत होतायत. याच आठवड्यात त्यातील पहिला टप्पाही पार पडतोय. त्यामुळे बदली कुठे होणार, असा प्रश्न पोलिसांना सतावतोय. जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे ‘गॅझेट’ याच आठवड्यात होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या गॅझेटनुसार शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांचे सध्याचं पोलिस स्टेशन सोडून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे. या बदल्या जिल्ह्यांतर्गत असल्या तरी पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाचंही स्थलांतर करावं लागतं. त्यामुळे पोलिसांचे दैनंदिन जीवन काही दिवसांसाठी विस्कळीत होते. दरवर्षी अशाच पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. एका पोलिस ठाण्यातील कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी नेमण्यात येतात. तर तेथील कर्मचाऱ्याला तिसऱ्याच ठाण्यात कर्तव्यावर जावे लागते. वास्तविक, पोलिस ज्याठिकाणी कार्यरत असतो त्याचठिकाणी त्याचे कुटुंब वास्तव्यास असते. कुटुंबाच्या सोयीसाठी संबंधित पोलिसाला सारासार विचार करावा लागतो. मुलांचे शिक्षण, दैनंदिन खरेदी, पाण्याची सोय, वातावरण याचा विचार करूनच पोलिसांना भाडेतत्त्वावर खोली घ्यावे लागते. त्याठिकाणी कुटुंबाला स्थिरस्थावर करावे लागते. मुलांना योग्य शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये हेलपाटे घालून दाखला घ्यावा लागतो. हे करीत असतानाही पोलिसांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. एवढे करून पोलिस व त्याचे कुटुंबीय संबंधित ठिकाणी स्थिर होत असताना बदलीचा भुंगा पोलिसांच्या मागे लागतो. रूळावर आलेलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून पोलिसाला दुसरं शहर गाठावं लागतं.सध्या यावर्षीच्या बदल्यांचे गॅझेट काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे अनेक पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. कुटुंबाला स्थलांतरीत करावे लागणार असल्याने काहींनी पॅकिंग करण्यासही सुरुवात केली आहे. कुठे ना कुठे बदली होणार, हे माहीत असल्याने कर्मचाऱ्यांनी तशी मानसिकताही केली आहे. मात्र, बदलीच्या विचाराने कुटुंबीयांची झोप उडाल्याचे दिसते. सध्या साताऱ्यासह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वच ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. विशेष पथकातील पोलिसही गॅसवरजिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसह विशेष पथकातील काही पोलिसांचीही यावर्षी बदली होणार आहे. जिल्हा पोलिस दलात मुख्यालय, कंट्रोल रूम, स्थानिक गुन्हे शाखा, बीडीडीएस, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, एमटीएस, वायरलेस, वुमेन सेल, दहशतवाद विरोधी, पोलिस वेलफेअर, सीसीटीएनएस अशी विशेष पथके आहेत. अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदलीपोलिस कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, हवालदार, सहायक फौजदार या पद्धतीने कर्मचाऱ्यांची पदे असतात. या कर्मचाऱ्यांची बदली दर पाच वर्षांनी होते. तर फौजदार, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी केल्या जातात.गावाजवळ जावं हीच इच्छाऐच्छिक बदलीच्या अर्जात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या मूळ गावानजीकचे पोलिस ठाणे सुचविले आहे. मात्र, पोलिस कर्मचारी ज्या गावातील आहे त्याच गावात शक्यतो त्याची बदली केली जात नाही.पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिली तरच कर्मचाऱ्याला त्याच्या तालुक्यात बदली मिळते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या आपल्या गावाजवळचं पोलिस स्टेशन मिळावं, अशीच अनेक कर्मचाऱ्यांची मनोमन इच्छा आहे.