शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधानाशी बेईमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:44 IST

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ ...

सातारा : ‘या जगात टिकून राहायचे असेल तर अंधश्रद्धा हद्दपार करणे गरजेचे असून, अंधश्रद्धा बाळगणे म्हणजे संविधनाशी बेईमानी आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले.सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृृती सामाजिक पुरस्कार अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना शाहू कला मंदिर येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते आणि खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, अमोल मोहिते, विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सातारी कंदी पेढे असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ‘अंनिस’च्या माध्यमातून सर्व जगाला मोठा मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारामध्ये समाजाला घडविण्याची क्षमता आहे.’ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर म्हणाले, ‘नरेंद्र दाभोलकरांनी विवेकाची वाटचाल सुरू ठेवली आहे. ती आजतागायत सुरू आहे.’ खासदार उदयनराजे म्हणाले, ‘डॉ. दाभोलकरांची आजही उणीव भासत आहे. ते चांगले खेळाडूही होते. विचारांची लढाई त्यांनी विचाराने लढली. त्यांचे कार्य आपण सर्वांनी समाजापुढे न्यावे.’दाभोलकरांचे कार्य प्रत्येकाने पुढे न्यावेज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, ‘जग अत्यंत वेगाने पुढे चालले आहे. वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली जात आहेत. शंभर वर्षांत जेवढी स्थित्यांतरे घडली नाहीत, तेवढी केवळ गेल्या दहा वर्षांत घडली आहेत. इतक्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणसाची विचार करण्याची क्षमता मजबूत नसेल तर समाज व्हावत जाईल, अशी भीती व्यक्त केली. तसेच डॉ. काकोडकर यांनी दाभोलकरांचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन यावेळी केले.