शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

दक्षिण दरवाजा उघडाच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 00:11 IST

‘रानवाटा’ची भूमिका : वन्यजीवांचा वावर विचारात घेण्याची अपेक्षा

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर नव्याने बसविण्यात आलेल्या दरवाज्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे; मात्र मानवेतर घटक विशेषत: वन्यजीवांच्या हालचालींना कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे मत रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळाने व्यक्त केले आहे. हा दरवाजा कायमस्वरूपी उघडाच ठेवावा, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली असून, तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अजिंक्यतारा परिसर अनेक वन्यजीवांचे वसतिस्थान आहे. परिसर जैवविविधतेने समृद्ध असल्याने कायमस्वरूपी निवासी आणि स्थलांतरित वन्यजीव येथे आहेत. त्यातील बिबट्या हा संवेदनशील प्राणी सध्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून, बिबट्याची मादी आणि पिलांचे दर्शन वारंवार होते. दक्षिणेस घनदाट जंगल, कचरा डेपो, उंटाचा डोंगर या ठिकाणी अन्नाची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने वन्यजीवांचा वावर आहे. परंतु हे जीव यवतेश्वर, जकातवाडी अशा आजूबाजूच्या भागात संचार करताना आढळतात. नुकतेच दोन बिबटे महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडले, तर एक तरस जखमी झाले. अन्न व पाण्याचा शोध, जोडीदाराचा शोध, स्वत:च्या वावरक्षेत्राचे रक्षण, सीमानिश्चिती अशा अनेक बाबी त्यांच्या स्थलांतरासाठी कारणीभूत असतात. वनक्षेत्र आणि मानवी क्षेत्र या सीमा त्यांना समजत नसल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहतो. किल्ल्याच्या दक्षिण बाजूकडून वर येण्यासाठी दक्षिण दरवाजा हा एकच मार्ग वन्यजीवांना उपलब्ध आहे. किल्ल्यावर बारमाही पाणीसाठा असून, पाण्यासाठी वन्यजीव त्याचा वापर करतात, असे आढळले आहे. शेजारील जंगलातून अनेक प्राणी दक्षिण दरवाज्याच्या मार्गाने रात्रीच्या वेळी किल्ल्यावर येतात. तो बंद राहिल्यास स्थलांतराचा मार्ग खुंटण्याची शक्यता आहे. म्हणून तो उघडाच ठेवावा, अशी अपेक्षा संस्थेच्या अध्यक्षा सीमांतिनी नूलकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, सचिव विशाल पाटील व सदस्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत सूचना४दक्षिण दरवाजा ३६५ दिवस, २४ तास उघडाच राहील अशी दक्षता घ्यावी.४या दरवाज्याला एक दिंडी दरवाजाही आहे. परंतु वन्यजीवांच्या मानसशास्त्राचा विचार करता दिंडी दरवाजा उघडा ठेवल्यास त्याचा वापर वन्यजीवांकडून होण्याची शक्यता नगण्य आहे.४ समाजकंटक, खोडसाळ व्यक्तींकडून हा दरवाजा बंद केला जाऊ शकतो; त्यामुळे तो बंद करताच येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी.