शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

अग्निशमन दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST

कऱ्हाड : जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना राख्या बांधण्यात आल्या. राष्ट्रवादी ...

कऱ्हाड : जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना राख्या बांधण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने हे अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या संगीता साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मनीषा साळुंखे, प्रांजली साळुंखे, दीपाली साळुंखे, दीपाली सुनील साळुंखे, मीना साळुंखे यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन विनोद कात्रे, संजय अडसूळ, विक्रम जाधव, सतीश पवार, सुजित साळुंखे, अविनाश फडतरे, गणेश शेजवळ उपस्थित होते.

शिवनगरला ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. सावंत यांच्या संकल्पनेतून शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यालयांमध्ये दहा ते अकरा गावांतील विद्यार्थी येत असतात. विद्यार्थी संख्याही जास्त राहाते. मात्र, कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दररोज शिक्षक विद्यालयात उपस्थित राहून ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करीत आहेत. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने मुख्याध्यापक सावंत यांनी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी पाच ते सात विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना पाठ समजावून सांगणे, उजळणी घेणे, प्रश्नोत्तरे, चाचण्या, गृहपाठ देऊन ते तपासून घेतले जातात.

आदर्श प्राथमिक विद्यालयात राखी प्रदर्शन

कऱ्हाड : मलकापूर येथील मळाई देवी शिक्षणसंस्था संचलित आदर्श प्राथमिक विद्यालयात राखी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. रक्षाबंधन सणासाठी आयोजित या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: राख्या बनवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जीवनातील रक्षाबंधनाचे महत्त्व त्यांना शिक्षकांनी सांगितले. प्रदर्शनाला सचिव अशोकराव थोरात, भास्करराव पाटील, वसंतराव चव्हाण, स्वाती थोरात, तुळशीराम शिर्के यांनी भेट दिली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी स्वाती थोरावडे, मनीषा माने, जयश्री तडाखे, शंकर काकडे यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेची बैठक उत्साहात

कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली. कोरोनाकाळात राष्ट्रीय सेवा योजनेवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यावेळी शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये यांनी केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. पाटील होते. यावेळी प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, प्रा. वंदना किशोर, विद्या पाटील, योगेश कस्तुरे, रोहिणी शेळके, रमेश पोळ उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभय पाटील यांनी आभार मानले. कोमल कुरुंदकर यांनी सूत्रसंचालन केले.