शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मदत मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा

By admin | Updated: September 4, 2016 00:28 IST

उदयनराजे भोसले : महामार्ग प्राधिकरणावर आगपाखड; समन्वय समितीच्या बैठकीत कारवाईच्या सूचना

सातारा : ‘हायवे हा ‘हाय वे’ नाही तो ‘डेथ वे’आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही, इतके अपघात या महामार्गावर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. पीडिताला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपाध्यक्ष रवी साळुंखे आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला वाहतूक पोलिस विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माणची धावपटू ललिता बाबर हिच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी यावेळी प्रास्ताविक करून संगणकीय सादरीकरण केले. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, ‘काळ्या यादीत असणारी लोकं महामार्गाचे काम करीत आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण पुलांची कामे दिसून येतात. मग टोल कशासाठी द्यायचा, असा प्रश्न करून या महामार्गावर एकही अपघात झाला तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनी दोषी धरून कठोर कारवाई करावी. जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा,’ अशी सूचना केली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी संगणकीय सादरीकरण करून आढावा दिला. शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधीकृषी खात्याच्या कारभाराची होणार चौकशी ! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून मागितलेली माहिती मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, ‘तालुकास्तरावर त्यांनी किती बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही. कृषी खात्याने केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. कृषी खात्याच्या कारभाराविषयी चौकशी नेमण्यात यावी. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वय आणि सकामरात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे. या जिल्ह्याने राज्याला दिशा दिली आहे. भविष्यात जिल्ह्याची आणखी मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले.कातकरी समाजाला घरकूल : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीची सूचना देण्यात आली आहे. कातकरी समाजाला घरकूल मिळण्याबाबत क्लस्टर पद्धतीने करता येईल का, याबाबत ‘डीआरडीए’ने अभ्यास करावा. फळबाग लागवड संदर्भातील तक्रारीबाबतचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांमध्ये काही बँकांची प्रगती चांगली आहे. अजूनही चांगले काम बँकांनी करावे,’ अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.