शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मदत मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा

By admin | Updated: September 4, 2016 00:28 IST

उदयनराजे भोसले : महामार्ग प्राधिकरणावर आगपाखड; समन्वय समितीच्या बैठकीत कारवाईच्या सूचना

सातारा : ‘हायवे हा ‘हाय वे’ नाही तो ‘डेथ वे’आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही, इतके अपघात या महामार्गावर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. पीडिताला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपाध्यक्ष रवी साळुंखे आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला वाहतूक पोलिस विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माणची धावपटू ललिता बाबर हिच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी यावेळी प्रास्ताविक करून संगणकीय सादरीकरण केले. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, ‘काळ्या यादीत असणारी लोकं महामार्गाचे काम करीत आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण पुलांची कामे दिसून येतात. मग टोल कशासाठी द्यायचा, असा प्रश्न करून या महामार्गावर एकही अपघात झाला तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनी दोषी धरून कठोर कारवाई करावी. जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा,’ अशी सूचना केली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी संगणकीय सादरीकरण करून आढावा दिला. शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधीकृषी खात्याच्या कारभाराची होणार चौकशी ! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून मागितलेली माहिती मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, ‘तालुकास्तरावर त्यांनी किती बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही. कृषी खात्याने केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. कृषी खात्याच्या कारभाराविषयी चौकशी नेमण्यात यावी. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वय आणि सकामरात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे. या जिल्ह्याने राज्याला दिशा दिली आहे. भविष्यात जिल्ह्याची आणखी मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले.कातकरी समाजाला घरकूल : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीची सूचना देण्यात आली आहे. कातकरी समाजाला घरकूल मिळण्याबाबत क्लस्टर पद्धतीने करता येईल का, याबाबत ‘डीआरडीए’ने अभ्यास करावा. फळबाग लागवड संदर्भातील तक्रारीबाबतचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांमध्ये काही बँकांची प्रगती चांगली आहे. अजूनही चांगले काम बँकांनी करावे,’ अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.