शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लग्नातील नेत्यांच्या सत्कारांना कवठेकरांनी दिला नारळ

By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST

गावबैठकीत निर्णय : गावाने सक्तीने निर्णय पाळण्याच्या सूचना

विनोद पोळ / कवठे कोणतेही शुभकार्य असले की त्यात गावातील मान्यवरांचा सत्कार समारंभ घेतला जातो. सोहळा लग्नाचा पण विधी बाजूला ठेवून, वऱ्हाडी मंडळीला अक्षता हातात घेऊन ताटकळवत बसवून गावपुढाऱ्यांचा हारतुरे, नारळ देऊन सत्कार करण्याचे फॅड अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. आपल्या शुभकार्यात किती मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली याचा आनंद कार्यमालकाला होत असला तरी इतरांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. लग्नकार्यात सर्वांना मान मिळावा, यासाठी कवठे गावात ग्रामस्थांनी ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावची यात्रा संपल्यानंतर संपूर्ण वर्षभराच्या हिशोबाची बैठक घेतली जाते व हिशोब वाचनानंतर गावातील महत्त्वाच्या सामाजिक हिताच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जे निर्णय घेण्यास ग्रामपंचायतीला अडचणीचे ठरू शकते, असे बहुतेक सर्व निर्णय गावबैठकीत घेतले जातात व ते गावास बंधनकारक असतात. यंदाच्या गावबैठकीत हिशोब वाचन झाल्यानंतर एका असाच क्रांतिकारक निर्णयासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोणाचेही लग्नकार्य असले की गावातील प्रत्येक संस्थेचे आजी, माजी पदाधिकारी यांचा नामोल्लेख करून त्यांना श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्याची परंपरा बहुतेक विवाहसोहळ्यात पाळतात. या विषयावर चर्चा होऊन लग्न समारंभात येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या समारंभातील महत्वाची आहे. सर्वांचाच सत्कार टाळला तर सर्वाना समान वागणूक मिळेल, असा गावबैठकीत निर्णय झाला. गावकारभाऱ्याची नेमणूक कवठे, ता. वाई हे राजकीय दृष्ट्या पुढारलेले गाव. येथे ग्रामपंचायत स्वतंत्र कारभार करते तर त्याला समांतर अशा पद्धतीने गावकारभार चालतो. भैरवनाथाच्या यात्रेपूर्वी दोन वर्षासाठी गावकारभाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण वर्षभर गावाचा कारभार चालविला जातो.