शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:49 IST

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या ...

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मात्र, संवर्धनाअभावी या किल्ल्याची दुरवस्था होत चालली आहे. देशभरातील हजारो पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. मात्र, किल्ल्याकडे जाणारा रस्ताच पूर्णपणे उखडल्याने पर्यटकांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन किल्ल्यावर नेण्याऐवजी अनेक पर्यटक व नागरिक चालत जाणेच पसंत करतात. रस्त्याकडेला असलेली सुरक्षा रेलिंगही तुटल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत होता.किल्ल्याचा या परिस्थितीबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.अखेर शासनाकडून या रस्त्याच्या कामास हिरवा कंदील देण्यात आला. नुकताच या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गोडोली अजिंक्यतारा प्रवेश कमान ते किल्ला प्रवेशद्वार या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्यताºयावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सातारकरांमधून नाराजी व्यक्त होत होती.वनविभागाची परवानगी गरजेचीअजिंक्यतारा किल्ल्याचा काहीसा भाग हा वनविभागाच्या हद्दीत आहे. ही बाब बांधकाम विभागाला अडचणीची ठरणार आहे. वनविभागाने परवानगी दिली तरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देण्यात आली असून, वनविभागाच्या परवानगी शिवाय कामास प्रारंभ करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.पर्यटकांचा मार्ग सुकरकास पठार, सज्जनगड, ठोसेघरला भेट देणारे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देतात. परंतु खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येणे टाळतात. रस्त्याचे मजबुतीकरण केल्यानंतर पर्यटकांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. रस्ता दुरुस्तीनंतर पर्यटनविकासाला चालना मिळणार आहे. पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.