शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

‘अजिंक्यतारा’चा रस्ता टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:49 IST

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या ...

सातारा : इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आता काट टाकणार आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मात्र, संवर्धनाअभावी या किल्ल्याची दुरवस्था होत चालली आहे. देशभरातील हजारो पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. मात्र, किल्ल्याकडे जाणारा रस्ताच पूर्णपणे उखडल्याने पर्यटकांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन किल्ल्यावर नेण्याऐवजी अनेक पर्यटक व नागरिक चालत जाणेच पसंत करतात. रस्त्याकडेला असलेली सुरक्षा रेलिंगही तुटल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत होता.किल्ल्याचा या परिस्थितीबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला.अखेर शासनाकडून या रस्त्याच्या कामास हिरवा कंदील देण्यात आला. नुकताच या रस्त्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी २७ लाख ४७ हजार १११ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गोडोली अजिंक्यतारा प्रवेश कमान ते किल्ला प्रवेशद्वार या मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्यताºयावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे सातारकरांमधून नाराजी व्यक्त होत होती.वनविभागाची परवानगी गरजेचीअजिंक्यतारा किल्ल्याचा काहीसा भाग हा वनविभागाच्या हद्दीत आहे. ही बाब बांधकाम विभागाला अडचणीची ठरणार आहे. वनविभागाने परवानगी दिली तरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. या कामाचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देण्यात आली असून, वनविभागाच्या परवानगी शिवाय कामास प्रारंभ करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.पर्यटकांचा मार्ग सुकरकास पठार, सज्जनगड, ठोसेघरला भेट देणारे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देतात. परंतु खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक किल्ल्यावर येणे टाळतात. रस्त्याचे मजबुतीकरण केल्यानंतर पर्यटकांची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. रस्ता दुरुस्तीनंतर पर्यटनविकासाला चालना मिळणार आहे. पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.