शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

कासचा साठा आठ फुटांवर

By admin | Updated: May 10, 2017 22:50 IST

कासचा साठा आठ फुटांवर

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. सद्य:स्थितीत तलावात केवळ आठ फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, येत्या तीन-चार दिवसांत तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.गेल्या आठवड्यात तलाव परिसरात वळवाच्या पावसाने दोनदा हजेरी लावली. मात्र, तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा एका फुटाने कमी आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.कास तलावाचा पाणीसाठा एकूण २४ फुटांपर्यंत असतो. २००३ मध्ये उन्हाळ्यात तलावातील पाणी अगदी पाच फुटांपर्यंत आले होते. तेव्हा सर्वात खाली असणाऱ्या तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे देखील तेव्हा पाणीपुरवठा होत नव्हता. ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तलावावर इंजिन बसवून पाणी पाटात सोडून पाणीपुरवठा केला जात होता. तशीच परिस्थिती यंदा उद्भवू शकते.सध्या तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र इंजिनद्वारे उपसा करून पाटात सोडले जात आहे. तलावातील पातळी खालावत चालल्याने तलाव कधी बेटाचे तर कधी स्वीमिंग टँकचे रूप घेऊ लागला आहे. यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक झाले आहे.शहराला तीन व्हॉल्व्हमधून पुरवठाशहराला कास तलावातील एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह गेल्या काही महिन्यांपूर्वीच उघडा पडला आहे. पाणी पुरवठ्याचा दुसरा व्हॉल्व्हही आता उघडा पडत चालला आहे.... तर इंजिन बसवून करावा लागणार उपसाशहराला पाणीपुरवठा करताना दररोज एका इंचाने तलावातील पाणी पातळी कमी होत आहे. तीन-चार दिवसांत दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने सर्वात खाली असलेल्या व शेवटच्या तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मान्सूनचे वेळेवर हजेरी न लावल्यास तलावावर इंजिन बसवून पाणी उपसा करून पाणी पाटात सोडावे लागणार आहे.