शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

कास तलाव भरला !

By admin | Updated: June 23, 2015 00:25 IST

कण्हेरच्या पाणी पातळीतही वाढ : बामणोली परिसरात संततधार

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव पहिल्याच पावसात भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून सोमवारी पहाटेपासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. यामुळे सातारा शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.यावर्षी पावसाला काहीसा उशीर झाल्याने सातारा शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. निम्मा जून संपला तरी सातारा शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाली. शनिवारपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे कास तलावातील पाणीसाठा वाढू लागला होता. अर्ध्या टीएमसीचे तलाव भरल्याने शहराचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. झरे फुटून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहू लागले आहे. कास पठारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे एकीव धबधब्याला पाणी वाढले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रस्त्यावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच लहान-मोठे धबधबेही कोसळू लागली आहेत. कृषी विभागातर्फे बांधलेले बंधारे भरण्याच्या स्थितीत आले आहेत.यवतेश्वर घाटात दमदार पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर माती पसरली आहे. पारंबे फाट्यापासून उजव्या दिशेने रस्त्यावर मोठमोठे दरडी कोसळल्याने रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनावळे ते पारंबे फाटा दरम्यान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी फांद्या तुटून तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)