शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कास तलाव भरला !

By admin | Updated: June 23, 2015 00:25 IST

कण्हेरच्या पाणी पातळीतही वाढ : बामणोली परिसरात संततधार

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव पहिल्याच पावसात भरला आहे. तलावाच्या सांडव्यावरून सोमवारी पहाटेपासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. यामुळे सातारा शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.यावर्षी पावसाला काहीसा उशीर झाल्याने सातारा शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. निम्मा जून संपला तरी सातारा शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाली. शनिवारपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे कास तलावातील पाणीसाठा वाढू लागला होता. अर्ध्या टीएमसीचे तलाव भरल्याने शहराचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. झरे फुटून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहू लागले आहे. कास पठारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे एकीव धबधब्याला पाणी वाढले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर रस्त्यावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच लहान-मोठे धबधबेही कोसळू लागली आहेत. कृषी विभागातर्फे बांधलेले बंधारे भरण्याच्या स्थितीत आले आहेत.यवतेश्वर घाटात दमदार पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर माती पसरली आहे. पारंबे फाट्यापासून उजव्या दिशेने रस्त्यावर मोठमोठे दरडी कोसळल्याने रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनावळे ते पारंबे फाटा दरम्यान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी फांद्या तुटून तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)