शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

‘कास’ आटला; पर्यटकांचा पूर !

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

सलग सुट्यांमुळे गर्दी : पर्यटकांनी लुटला पोहण्याचा मनसोक्त आनंद

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सर्वांचेच आकर्षण असणाऱ्या कास पर्यटनस्थळी सलग सुट्टया व उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे परिसर पर्यटकांनी बहरून गेला आहे. कास तलावावर नुकतेच साकारलेल्या बेटावर पर्यटक मनमुराद आनंद लुटत जणू काही आज कासबरोबर स्वर्गच साकारल्याची आगळी वेगळी पर्वणी पाहावयास मिळत होती.कास तलावात सध्या साडेसात फूट पाणीसाठा शिल्लक असून पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने सध्या दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे व धरणावरचे पाणी एकत्रित सोडले जात आहे. कास तलावातील पाणीपातळी खालावल्याने कित्येक ठिकाणी जमिनी उघड्या पडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच कास तलावाला बेटाचे स्वरूप आले होते. सध्या तर तलावात शनिवार, रविवर सुट्टया तसेच उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपत आल्याने परगावहून आपापल्या पाहुण्यांकडे आलेल्या नातेवाईकांनी कास तलावावर मोठी गर्दी केली होती. तलावावर साकारलेल्या बेटावर पर्यटक आपापल्या वाहनांसमवेत मनमोहक निसर्गाचा आनंद लुटत येथील दृष्य कॅमेऱ्यात टिपत आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी जलविहाराचा आनंदही लुटला. (वार्ताहर)२० दिवस पुरेल एवढेच पाणी कास तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा वेळा इंजिनद्वारे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणी तिसऱ्या व्हॉल्व्हवरील संरक्षक जाळीच्या खाली आले आहे. धरणाची पाणीपातळी आठ फुटांवरून कमी होऊन साडे सात फुटांवर आली आहे. केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी सध्या धरणात शिल्लक आहे. जर मान्सून वेळेवर आला नाही तर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.