शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

By admin | Updated: September 8, 2015 22:03 IST

सभागृहात एकमुखी ठराव: अधिकाऱ्यांवर सदस्यांचे ताशेरे; अधिकारी व सदस्यांमध्ये खडाजंगी --पंचायत समितीमासिक सभा

कऱ्हाड : दुष्काळी भागाबाबत विचार केल्यास मराठवाड्यात सर्वात जास्त दुष्काळ पडला आहे. असे सर्वचजण म्हणतात. मात्र, सातारा जिल्ह्यातही दुष्काळ पडला आहे. मराठवाड्यात ५५ टक्के पाऊस पडला तर त्याठिकाणी शासन दुष्काळ जाहीर करत असेल तर सातारा जिल्ह्याने काय केले आहे. जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात तर ३०.९० टक्के इतकाच पाऊस पडला आहे. तरी सुद्धा या तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले जात नाही. जिल्हावार दुष्काळ जाहीर न करता तो तालुकावार पद्धतीने जाहीर करत कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. असा एकमुखी ठराव कऱ्हाड पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सभेत सदस्यांसह सभापतींनी ताशेरे ओढले. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृह बचतभवन येथे पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. तर उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषी विभागाचा आढावा मांडला. तालुक्यात सध्या ३०.९० टक्के इतका पाऊस पडला असल्याचे सांगत तालुक्यात खरीप हंगामातील पिके पुर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सभागृहास माहिती दिली. शामगाव येथे चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याठिकाणी चारा छावणी उभारण्यात यावी अशी मागणी तेथील परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी सभेदरम्यान दिली.व्यावसायिक वीज कर आकारणी ही विविध फरकाने वीज वितरण कंपनीने करावी अशी तरतूद असताना वीज वितरण कंपनीकडून मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तसेच उंडाळे परिसरात नादुरूस्त मीटरची संख्या वाढली आहे. तर मसूर विभागात वीज नाही, शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी नाही तसेच वीज गेल्यास वायरमन देखील नाही. अशा गैरसोयी या ठिकाणी निर्माण झाल्याने येथील शेतकऱ्यांनी अवस्था बिकट बनली आहे. अशात वीज वितरण विभागातील अधिकारी काय करत आहेत. अशा शब्दात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांसह सभापतींनी ताशेरे ओढले. मसूर या ठिकाणी पाणी, वीज नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील शेतकऱ्याची अवस्था गंभीर बनली आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास त्याकडे वीजवितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ठराव मांडायचे कशाला, अशा शब्दात सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तसेच लघुसिंचन विभागाच्या आढावावेळी तालुक्यात बंधारे बांधण्यापेक्षा कायस्वरूपी पाणी कसे टिकून राहील अशा उपाययोजना करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना सदस्यांनी दिल्या.यावेळी पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शेती विभाग, लघुसिंचन विभाग, रोपवन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस टी महामंडळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. (प्रतिनिधी) मराठवाड्यात विमाने फिरत असतील तर साताऱ्यात का नाही ?संपूण राज्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मराठवाड्यात दुष्काळ पडला म्हणून पाऊस पाडण्यासाठी त्या ठिकाणी विमाने सोडली. राज्यामध्ये सातारा जिल्ह्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. याही जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. मग सातारा जिल्ह्यात पाऊस पाडण्यासाठी विमान फिरवायला पाहिजे, अशी मागणी पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांनी केली.ठराव काय ग्रामपंचायतीतर्फे देऊ का ?सामान्य शेतकऱ्यांच्या तक्रारी व समस्या अधिकाऱ्यांपुढे सदस्यांकडून अनेकवेळा मांडून देखील त्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते. पंचायत समितीकडून वारंवार प्रलंबित कामाबाबत ठराव मांडूनही देखील काही होत नसेल तर आता काय ग्रामपंचायतीचे ठराव द्यायला हवेत काय ? अशा शब्दात पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. तालुक्यात ब्रिटीशकालीन बंधारे किती आहेत ?पंचायत समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक सभेत लघुसिंचन विभागाचे ओगलेवाडीचे उपविभागीय अधिकारी हे आपल्या विभागाचा आढावा मांडण्यासाठी आले असता. त्यांच्यावर सभापतींसह सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. आढाव्यावेळी सदस्यांनी अधिकाऱ्यांना तालुक्यात ब्रिटीशकालीन बंधारे किती आहेत? अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.