शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

कऱ्हाड पालिकेच्या घनप्रकल्पाचा ‘कचरा’!

By admin | Updated: September 30, 2015 00:04 IST

ढीग जैसे थे : कचरा एकत्रिकरणास दिवसाकाठी १३ हजारांचा खर्च; दररोज सरासरी चाळीस टन कचरा

संतोष गुरव -कऱ्हाड शहरातील वाढीव हद्दीसह अंतर्गत भागातून दररोज सुमारे ४० टन कचरा पालिकेकडून एकत्रित केला जात आहे. गणेशोत्सवात शहरातून अकरा दिवसांत फक्त अठरा टन निर्माल्य गोळा झाले. दिवसाला गोळा होणारा २० टन ओला कचरा आणि २० टन सुका कचरा अशा साधारणत: ४० टन कचऱ्यांवर पालिकेने प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पूर्वीच्या घनकचरा प्रकल्पाचीही अवस्था सध्या बिकट असल्याने आता दररोज शहरातून गोळा केला जाणारा ४० टन कचरा व गणेशोत्सवात गोळा झालेले १८ टन निर्माल्य अशा एकूण ५८ टन कचऱ्याची विल्हेवाट पालिका कशी लावणार, असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.घनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेला दिवसाकाठी १३ हजार ६९८ रूपये इतका खर्च करावा लागत असल्याने पालिकेने २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे. शहरातील नागरिक, दुकानदार तसेच भाजीविक्रेते यांच्याकडून दररोज होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून आरोग्य विभागातील स्वच्छता टीमच्या माध्यमातून शहरातील कचरा दररोज एकत्रित केला जातो. एकत्रित केला गेलेला कचरा शहराबाहेरील हद्दवाढ झालेल्या ‘बाराडबरी’ या ठिकाणी साठवला जात आहे. कऱ्हाड पालिकेने दुर्गंधीयुक्त ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेट्रिक टन क्षमतेच्या बायोगॅस / वीजनिर्मिती भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबई (बीएआरसी) यांच्या प्रकल्प उभारणीस मंजुरी मिळालेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) या योजनेतून घेतला जाणार असून या प्रकल्पाची किंमत १ कोटी ६ लाख इतकी आहे. कारण या ठिकाणी पालिकेकडून दररोज ४० टन घनकचरा टाकला जात असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातून दररोज ४० टनाच्या आसपास घनकचरा हा ‘बाराडबरी’ या ठिकाणी पालिकेकडून टाकला जात आहे. परिणामी महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात घनकचरा या ठिकाणी साठवला जात आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडून दरवर्षी ठरावीक रक्कम खर्च केली जाते. यामध्ये दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही केली जाते. या २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद पालिकेने केली आहे २०१४-१५ वर्षीच्या अर्थसंकल्पात ३० लाख रूपयांची तरतूद के ली होती.शहरातून दररोज ४० टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. शहरासह वाढीव हद्दीतून गोळा केला जाणाऱ्या घन कचऱ्यास तेवढा खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. घनकचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून दिवसाकाठी १३ हजार रूपये तर वर्षाकाठी ५० लाख रूपये इतका खर्च पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी केला जातो. एवढ्या मोठ्या कचऱ्याचे होणार तरी काय, असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. हा प्रकल्प परिसरासाठी डोकेदुखी ठरला आहे. पार्ले-बनवडीकरांचा विरोधपालिकेकडून शहराबाहेर घनकचरा बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानुसार पार्ले-बनवडी या गावच्या हद्दीत एकूण १४ एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, या प्रकल्पास पार्ले-बनवडी येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने पालिकेला प्रकल्प उभारता आला नाही. तो बाराडबरी या ठिकाणी उभारण्यात यावा, असा निर्णय पालिकेने घेतला.पालिकेची स्वच्छता टीमपालिकेच्या आरोग्य विभागाकडून १ कॉम्पॅक्टर, २ डंपरप्लेसर, ३ टॅक्टर, १६ घंटागाड्या, १ रोड स्वीपर, ४८ कचरा कुंड्यांतून २१५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा एकत्रित केला जातो.