शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

कऱ्हाडला ‘प्रशासकीय’साठी मोठा पल्ला!

By admin | Updated: June 20, 2014 23:06 IST

उद्योजकांचीही अपेक्षा : नवीन उद्योगांचे होेऊ शकते आगमन, विमानतळ विस्तारीकरणही ठरु शकेल पूरक

कऱ्हाड : कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही मागणी प्रामुख्याने उद्योग जगताकडूनच गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. कऱ्हाड तालुक्यामध्ये सध्या अनेक औद्योगिक प्रकल्प असले तरी त्याला मर्यादा पडत आहेत. अनेकवेळा किरकोळ प्रशासकीय कामांसाठीही उद्योजकांना पन्नास किलोमीटरचा पल्ला पार करुन जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारे शहर असल्यामुळे कऱ्हाडसह आजुबाजुच्या परिसराला खूप महत्व आले आहे. येथील तासवडे एमआयडीसीसह अनेक ठिकाणी लहानमोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. विविध प्रकारच्या सेवा व्यवसायांचेही कऱ्हाड परिसरात मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. परंतु या व्यावसायिकांना अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा आणि वेळ खर्च होत असतो. यासाठीच येथील औद्योगिक जगताला कऱ्हाडला जिल्ह्याचे ठिकाण बनण्याची प्रतीक्षा आहे. कऱ्हाडची बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या बाजारपेठांपैकी एक समजली जाते. परंतु येथील व्यावसायिकांनाही अनेकवेळा प्रशासकीय कामांसाठी साताऱ्याची वारी करावी लागते. कऱ्हाड तालुक्याच्या पूर्व भागात आणखी एका एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास या एमआयडीसीचे कामही चांगल्या प्रकारे मार्गी लागू शकते. या एमआयडीसीकडे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कऱ्हाडला जिल्ह्याचा दर्जा देण्याचे पाऊल उपयुक्त ठरु शकते. (लोकमत टीम)