शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ढेबेवाडी खोऱ्यात ज्वारीवर ‘काणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे ...

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे काळवंडल्यासारखी दिसत असून उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ढेबेवाडी परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. त्यावरच शेतकरी कुटुंबांचे वर्षभराचे धान्य नियोजन अवलंबून असते. अलीकडे पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने शेतकऱ्यांचे खरिपातील ज्वारीचे गणित फसत आहे. ऐन काढणीच्या काळातच पावसात सापडल्याने पीक हातचे गेल्याचा अनुभव वारंवार येत असल्याने आता बहुतेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीवरच भिस्त ठेवली आहे. थंडीच्या दिवसात अल्प पाण्यावर साधणाऱ्या रब्बी ज्वारीचे क्षेत्रही या परिसरात मोठे असून रानडुकरांकडून काही प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा अपवाद वगळता उत्पादनही चांगले मिळत आहे.

यंदा चांगले पाऊसमान व पोषक हवामान यामुळे चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची ज्वारीवरील काणी रोगाच्या प्रादुभार्वामुळे झोप उडाली आहे. या रोगात बुरशी संक्रमणामुळे कणीसावर काळपटपणा दिसतो. ज्वारी फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस किंवा धुक्यामुळे त्यावर रोगाचा फैलाव होतो, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सांगितले.

‘पेरणीपूर्वी गंधकाची पाच ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो. पीक फुलोऱ्यात असताना कॅप्टन किंवा मॅनकोझेब तीन ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणेही उपयुक्त ठरते. पिकाची फेरपालट करावी. हलक्या जमिनीवर रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत. म्हणजे पुढे रोगाचा प्रसार होणार नाही’, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सुचविले आहे.

सध्या ढेबेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी काणीचा फैलाव झाल्याचे दिसून येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांना अद्यापही यश आलेले नाही.

- कोट

यंदा ज्वारीचे पीक चांगले साधेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, काणीच्या प्रादुर्भावामुळे जादा उत्पन्नाची शाश्वती वाटत नाही. बहुतेक शिवारातील ज्वारीची कणसे काळी पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.

- दिलीपराव पाटील, शेतकरी

- चौकट

वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला

ढेबेवाडी खोऱ्यात बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात. येथील शेतजमीन मुरमाड आहे. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. रब्बी हंगामातील वातावरण येथे पोषक असते. त्यामुळे या हंगामात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र लागवडीखाली असते. सध्या रब्बी पिके जोमात आली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांकडून या पिकांचे नुकसान केले जात आहे. प्राण्यांच्या उपद्रवामुळेही शेतकरी हतबल झाले आहेत.

फोटो : ०१केआरडी०५

कॅप्शन : ढेबेवाडी विभागात ज्वारीवर काणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक काळवंडले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.