शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ढेबेवाडी खोऱ्यात ज्वारीवर ‘काणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे ...

सणबूर : परिसरात रब्बी ज्वारीवर काणी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काणीग्रस्त कणसांमुळे ज्वारीची शिवारे काळवंडल्यासारखी दिसत असून उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ढेबेवाडी परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. त्यावरच शेतकरी कुटुंबांचे वर्षभराचे धान्य नियोजन अवलंबून असते. अलीकडे पावसाचे वेळापत्रक कोलमडल्याने शेतकऱ्यांचे खरिपातील ज्वारीचे गणित फसत आहे. ऐन काढणीच्या काळातच पावसात सापडल्याने पीक हातचे गेल्याचा अनुभव वारंवार येत असल्याने आता बहुतेक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीवरच भिस्त ठेवली आहे. थंडीच्या दिवसात अल्प पाण्यावर साधणाऱ्या रब्बी ज्वारीचे क्षेत्रही या परिसरात मोठे असून रानडुकरांकडून काही प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा अपवाद वगळता उत्पादनही चांगले मिळत आहे.

यंदा चांगले पाऊसमान व पोषक हवामान यामुळे चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची ज्वारीवरील काणी रोगाच्या प्रादुभार्वामुळे झोप उडाली आहे. या रोगात बुरशी संक्रमणामुळे कणीसावर काळपटपणा दिसतो. ज्वारी फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस किंवा धुक्यामुळे त्यावर रोगाचा फैलाव होतो, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सांगितले.

‘पेरणीपूर्वी गंधकाची पाच ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो. पीक फुलोऱ्यात असताना कॅप्टन किंवा मॅनकोझेब तीन ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणेही उपयुक्त ठरते. पिकाची फेरपालट करावी. हलक्या जमिनीवर रब्बी ज्वारीची पेरणी करताना रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत. म्हणजे पुढे रोगाचा प्रसार होणार नाही’, असे कृषी सहाय्यक एन. एस. मुळीक यांनी सुचविले आहे.

सध्या ढेबेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी काणीचा फैलाव झाल्याचे दिसून येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांना अद्यापही यश आलेले नाही.

- कोट

यंदा ज्वारीचे पीक चांगले साधेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, काणीच्या प्रादुर्भावामुळे जादा उत्पन्नाची शाश्वती वाटत नाही. बहुतेक शिवारातील ज्वारीची कणसे काळी पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.

- दिलीपराव पाटील, शेतकरी

- चौकट

वन्यप्राण्यांचा उपद्रवही वाढला

ढेबेवाडी खोऱ्यात बहुतांश शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात. येथील शेतजमीन मुरमाड आहे. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. रब्बी हंगामातील वातावरण येथे पोषक असते. त्यामुळे या हंगामात मोठ्या प्रमाणावर क्षेत्र लागवडीखाली असते. सध्या रब्बी पिके जोमात आली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांकडून या पिकांचे नुकसान केले जात आहे. प्राण्यांच्या उपद्रवामुळेही शेतकरी हतबल झाले आहेत.

फोटो : ०१केआरडी०५

कॅप्शन : ढेबेवाडी विभागात ज्वारीवर काणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक काळवंडले असून उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.