शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कण्हेर कालव्याला आरळे हद्दीत भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

वाढे : रब्बी हंगाम सुरू असताना आरळे (ता. सातारा) हद्दीतील सहा महिन्यांपूर्वी केलेल्या कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून ...

वाढे : रब्बी हंगाम सुरू असताना आरळे (ता. सातारा) हद्दीतील सहा महिन्यांपूर्वी केलेल्या कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या कालव्यावर ओलिताखाली असलेल्या हजारो एकर जमिनीला पाणी मिळणार नसल्याने शेतकऱ्यांवर संकटाचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, कण्हेर पाटबंधारे उपविभाग क्रमांक एकच्या कृष्णा सिंचन विभागाच्या माध्यमातून कालव्याच्या डागडुजीसाठी लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखविले आहेत तरीही भगदाड पडल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर हे मोठे प्रकल्प आहेत. या धरणाच्या पाण्यावरच रब्बी हंगाम अवलंबून असतो. कण्हेर पाटबंधारे उपविभाग क्रमांक एकच्या कृष्णा सिंचन विभागातील अधिकारी व ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फटका आरळे, वडूथ, वाढे, पाटखळ व परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. सहा महिन्यांपासून आरळे हद्दीत विद्युत पंपगृहानजीक असलेल्या कालव्याची सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून अस्तरीकरणासह डागडुजी करण्यात आली; परंतु चार दिवसांपूर्वी येथील कालव्याला दहा ते पंधरा फुटांचे भगदाड पडले. त्यामुळे कालव्यातून सिंचन सुरू असताना लाखो लिटरचे पाणी वाया गेले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यापूर्वी हा कालवा अनेकदा फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अनुभव पाठीशी असतानाही अधिकारी, ठेकेदार कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी कण्हेर, धोम धरणाच्या कालव्यांची डागडुजी आणि गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून येत असतो. प्रत्यक्षात या कामावर किती खर्च केला जातो हा संशोधनाचा विषय आहे. कालव्याच्या दुरुस्तीचा खर्च कागदोपत्री होत असल्याने वरचेवर कालवा फुटीच्या घटना होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत होऊ लागला आहे. येथील कालव्याच्या कामात योग्य क्षमतेचे लोखंडी बार बसविले नसून काही ठिकाणी त्याचा वापरच केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे. सिमेंटचा केवळ मुलामा लावलेल्या कालव्याचे अस्तरीकरण पूर्णपणे ढासळलेले असून कालवा फुटीच्या वारंवार घटना निकृष्ट दर्जाच्या कामामुळे होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चौकट

लोकप्रतिनिधीचे मौनच

या कालव्यावरती हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आर्थिक नुकसानीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कालवा फुटीच्या घटना घडत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी बसले आहेत. काम मंजूर करण्यापासून ते शेवटचे बिल काढेपर्यंत ठेकेदाराकडून दिल्या जाणाऱ्या टक्केवारीच्या लोण्याचे वाटेकरी अनेकजण असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी धोम धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके व शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो

११कण्हेर कालवा

कण्हेर डावा कालव्याला आरळे हद्दीत भगदाड पडले आहे. त्यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. (छाया : सुनील शिंदे)