शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

पाटण पंचायत समिती सभेत ‘कालवा-कालवा’

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

अधिकारी गेले उठून : गटविकास अधिकाऱ्यांसह तीन सदस्य गैरहजर

पाटण : पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेला गटविकास अधिकारी व इतर तीन सदस्य गैरहजर होते. तर तब्बल दोन तास चाललेल्या या सभेत काही प्रमुख विषय वगळता निव्वळ कालवा झाल्याने काही सदस्यांसह बहुतेक अधिकारी उठून गेले. सभेत आढावा देणाऱ्या अधिकाऱ्याचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सभापती, उपसभापती व प्रमुख सदस्य नव्हते. तसेच काही सदस्य मोबाईलवर मग्न होते. त्यामुळे सभा आहे की नाही, असेच चित्र होते. सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरू झाली. एक वाजताची सभा दीडला सुरू झाली. त्याअगोदर सभापती कक्षात देसाई-पाटणकर गटांच्या सदस्यांचे जणू मनोमिलन झाले की काय, असे चित्र दिसत होते. त्यामुळे क्षणातच सुरू होणाऱ्या सभेत जनतेच्या प्रश्नावर सदस्य पोटतिडकीने बोलतील, असे संकेत दिसत नव्हते. त्यातच आरोग्य वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे प्रमुख अधिकारी हजर नव्हते. तरीसुद्धा काही मोजक्याच विषयांवर चर्चा झाली. शिक्षण विभागातील कामकाजाची माहिती सदस्यांना दिली जात नाही. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती येऊन गेले ते सदस्यांना माहिती नाही. प्रगत आणि अप्रगत शाळांची माहिती बोगस दिली जाते. याबाबत रामभाऊ लाहोटी, राजाभाऊ शेलार यांनी आक्रमक भूमिका घेतली. पांथरपूंज या दुर्गम भागातील शाळेत एक महिला शिक्षक रुजू होत नाही. याबाबत शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यादरम्यान पांथरपूंज ग्रामस्थ तेथे उपस्थित राहिले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जगताप यांना त्या महिला शिक्षक हजर राहतील, असे आश्वासन द्यावे लागले. तालुक्यातील ४४ गावे ८८ वाड्या-वस्त्यांना टंचाई भासणार असून, त्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पाठविले आहेत. कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला हे कामावर का नाहीत, असे शोभा कदम व राजाभाऊ शेलार यांनी विचारले. तर कृषी सहायक गावागावांत जात नाहीत. अशी तक्रार नथुराम कुंभार यांनी केली. (प्रतिनिधी)मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळमोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव हे पंचायत समिती पदाधिकारी व जनतेला जुमानत नाहीत. ते वारंवार गैरहजर असतात. आरोग्य केंद्रातील कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे आरोप उपसभापती डी. आर. पाटील, नथुराम कुंभार, विजय पवार यांनी केले.उपसभापतींनी केली नाराजी व्यक्तसभेची सांगता करताना उपसभापती डी. आर. पाटील यांनी आजच्या बैठकीस अधिकारी व सदस्य यांची गैरहजेरी लक्षणीय दिसली. तोंडावर दिवाळी आल्याचा परिणाम दिसतोय, असा टोला मारून नाराजी व्यक्त केली.आमसभा तातडीने घ्यावीसन २००७-०८ मध्ये तालुक्याची आमसभा झाली होती. त्यावेळी सुद्धा गोंधळ झाल्याने ती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत आमसभा झाली नाही. तेव्हा सभापतींनी तातडीने आमसभा आयोजित करावी, अशी मागणी विजय पवार यांनी केली.लोकसंख्या जनगणनेचे काम माध्यमिक शिक्षकांनी करण्यास विरोध दर्शविला आहे. तेव्हा तसा ठराव घ्यावा, असे शोभा कदम म्हणाल्या. तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी लोकसंख्या गणनेचे काम करावे, असे मत राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केले. त्यावर सभागृहात मोठा हशा पिकला