शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पाटण पंचायत समिती सभेत ‘कालवा-कालवा’

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

अधिकारी गेले उठून : गटविकास अधिकाऱ्यांसह तीन सदस्य गैरहजर

पाटण : पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेला गटविकास अधिकारी व इतर तीन सदस्य गैरहजर होते. तर तब्बल दोन तास चाललेल्या या सभेत काही प्रमुख विषय वगळता निव्वळ कालवा झाल्याने काही सदस्यांसह बहुतेक अधिकारी उठून गेले. सभेत आढावा देणाऱ्या अधिकाऱ्याचे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सभापती, उपसभापती व प्रमुख सदस्य नव्हते. तसेच काही सदस्य मोबाईलवर मग्न होते. त्यामुळे सभा आहे की नाही, असेच चित्र होते. सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरू झाली. एक वाजताची सभा दीडला सुरू झाली. त्याअगोदर सभापती कक्षात देसाई-पाटणकर गटांच्या सदस्यांचे जणू मनोमिलन झाले की काय, असे चित्र दिसत होते. त्यामुळे क्षणातच सुरू होणाऱ्या सभेत जनतेच्या प्रश्नावर सदस्य पोटतिडकीने बोलतील, असे संकेत दिसत नव्हते. त्यातच आरोग्य वनविभाग, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे प्रमुख अधिकारी हजर नव्हते. तरीसुद्धा काही मोजक्याच विषयांवर चर्चा झाली. शिक्षण विभागातील कामकाजाची माहिती सदस्यांना दिली जात नाही. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती येऊन गेले ते सदस्यांना माहिती नाही. प्रगत आणि अप्रगत शाळांची माहिती बोगस दिली जाते. याबाबत रामभाऊ लाहोटी, राजाभाऊ शेलार यांनी आक्रमक भूमिका घेतली. पांथरपूंज या दुर्गम भागातील शाळेत एक महिला शिक्षक रुजू होत नाही. याबाबत शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यादरम्यान पांथरपूंज ग्रामस्थ तेथे उपस्थित राहिले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जगताप यांना त्या महिला शिक्षक हजर राहतील, असे आश्वासन द्यावे लागले. तालुक्यातील ४४ गावे ८८ वाड्या-वस्त्यांना टंचाई भासणार असून, त्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पाठविले आहेत. कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला हे कामावर का नाहीत, असे शोभा कदम व राजाभाऊ शेलार यांनी विचारले. तर कृषी सहायक गावागावांत जात नाहीत. अशी तक्रार नथुराम कुंभार यांनी केली. (प्रतिनिधी)मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळमोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जाधव हे पंचायत समिती पदाधिकारी व जनतेला जुमानत नाहीत. ते वारंवार गैरहजर असतात. आरोग्य केंद्रातील कर्मचारी झोपलेले आढळून आले. त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असे आरोप उपसभापती डी. आर. पाटील, नथुराम कुंभार, विजय पवार यांनी केले.उपसभापतींनी केली नाराजी व्यक्तसभेची सांगता करताना उपसभापती डी. आर. पाटील यांनी आजच्या बैठकीस अधिकारी व सदस्य यांची गैरहजेरी लक्षणीय दिसली. तोंडावर दिवाळी आल्याचा परिणाम दिसतोय, असा टोला मारून नाराजी व्यक्त केली.आमसभा तातडीने घ्यावीसन २००७-०८ मध्ये तालुक्याची आमसभा झाली होती. त्यावेळी सुद्धा गोंधळ झाल्याने ती रद्द झाली. त्यानंतर आजपर्यंत आमसभा झाली नाही. तेव्हा सभापतींनी तातडीने आमसभा आयोजित करावी, अशी मागणी विजय पवार यांनी केली.लोकसंख्या जनगणनेचे काम माध्यमिक शिक्षकांनी करण्यास विरोध दर्शविला आहे. तेव्हा तसा ठराव घ्यावा, असे शोभा कदम म्हणाल्या. तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी लोकसंख्या गणनेचे काम करावे, असे मत राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केले. त्यावर सभागृहात मोठा हशा पिकला