शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:29 IST

वाई : ‘आरोग्य हीच धनसंपत्ती मानून वाई येथील टीम वाई मॅरेथॉनच्या सदस्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे, याच ...

वाई : ‘आरोग्य हीच धनसंपत्ती मानून वाई येथील टीम वाई मॅरेथॉनच्या सदस्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे, याच आवडीतून विविध गडकिल्लांवर गिर्यारोहण करत नुकतेच महाराष्ट्रातील सर्वोच्च अशा कळसुबाई शिखरावर भारतीय ध्वज फडकावत, जणू वाईकर नागरिकांना फिटनेसचा कानमंत्र दिला.

यापूर्वी ग्रुपच्यावतीने वासोटा ट्रेक केवळ ४० मिनिटांत, तर कळसुबाई ट्रेक फक्त १ तास २० मिनिटांत पूर्ण करून अनेक दुर्गप्रेमींना प्रेरणा दिली आहे.

वाई शहर व वाई तालुक्यात नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा निर्माण व्हाव्यात, यासाठी टीम वाईचे सदस्य प्रयत्नशील असतात. वाईकरांच्या मनात धावण्याची आवड रुजवण्यास यशस्वी ठरले आहेत. दोन यशस्वी गरवारे हिलसाईड हाफ मॅरेथॉनच्या आयोजनानंतर कोरोना कालावधीत रुग्णांना जेवण वाटप, गरजूंना अन्नधान्य वाटप व वृक्षारोपण यासारख्या कार्यास टीमने हातभार लावला.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाईकरांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टिकोनातून द्रविड हायस्कूल वाई येथे रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत मोफत फिटनेस सेंटर सत्र सुरू केले आहे.

टीम वाई, गडकिल्ल्यांची भटकंती करत ट्रेकिंगची आवड समाजात निर्माण कशी होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. चंदन वंदन, केंजळगड, कमळगड पांडवगड, सोनजाई, वासोटा व नुकतीच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखर ट्रेकिंग मोहीम टीम वाईने फत्ते केली. यावेळी वाई शहरातील २५ ट्रेकर्ससह अथर्व फाैंड्रीचे नाईक, पुणे शहराचे एसीपी प्रकाश धस, विनायक नाईक, राजगुरू कोचळे, गिरीश गाढवे, विलास माळी, धोंडिराम वाडकर, महावीर कुपाडे, गोपाळ गरुड, अमृत देशमुख, नितीन देसाई, नंदकुमार डोईफोडे, उदय घाटगे, अनिल कोचळे, नितीन जगताप, चंद्रकांत सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोंडलाडे, दिलीप जामदार, वीरेंद्र काळे, शौर्य कोचळे, विघ्नेश जगताप, क्षीतिज घाटगे, आदित्य भोसले, शिवम कापले सहभागी झाले होते.

चौकट..

ट्रेक केल्याचा आनंद अविस्मरणीय...

महाराष्ट्रातील सर्वोच्च १६४६ मीटर उंचीचे कळसुबाई शिखर चढताना थोडेसे मनावर दडपण होते; परंतु पहाटेची वेळ, सुंदर वातावरण आणि टीमचा उत्साह यामुळे कमी वेळेत ट्रेक पूर्ण झाला. तीन अवघड टप्पे पूर्ण करताना थोडा थकवा जाणवला; मात्र ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद अविस्मरणीय होता.

- गोपाळ गरुड, शिक्षक, द्रविड हायस्कूल, वाई

फोटो आहे..

१८वाई

टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते करण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकविला.