शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काले, सैदापूर, उंब्रजची सरपंच निवड सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

निवड 8 व 10 रोजी, मोर्चेबांधणी सुरू कऱ्हाड : नुकत्याच निवडणुका झालेल्या कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींची सरपंच निवड ...

निवड 8 व 10 रोजी, मोर्चेबांधणी सुरू

कऱ्हाड : नुकत्याच निवडणुका झालेल्या कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींची सरपंच निवड सोमवार दि. ८ व बुधवार दि. १० रोजी होत आहे. तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या ग्रामपंचायती म्हणून ओळख असलेल्या काले, सैदापुर, उंब्रज व हजारमाचीची सरपंच निवड ८ रोजी होत आहे. याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

तालुक्यातील एकूण १०४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक व निकाल जाहीर झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. वास्तविक सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच गावोगावी सतास्थापनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

निवडणुका झालेल्या सर्व गावांना सरपंच निवडीची प्रतीक्षा लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान सरपंच निवडी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तालुक्यातील सर्व १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी ८ व १० रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अमरदीप वाकडे यांनी प्रशिक्षण दिले.

सोमवार दि. ८ रोजी सरपंच निवडी होणारी गावे : हजारमाची, किरपे, विंग, कार्वे, मुंढे, ओंड, शेरे, मालखेड, घारेवाडी, खुबी, गायकवाडवाडी, शहापूर, म्हासोली, कालवडे, साकुर्डी, जखिणवाडी, भोळेवाडी, धोंडेवाडी, पोतले, साळशिरंबे, शेवाळवाडी (म्हासोली), सवादे, केसे, घोगाव, गोटेवाडी, कोणेगाव, शिवडे, वस्ती साकुर्डी, उंब्रज, इंदोली, मरळी, तासवडे, शिरवडे, शिरगाव, वहागाव, तांबवे, खराडे, पाल, साजुर, गोळेश्वर, वारूंजी, चिखली, वाठार, कोळे, सैदापूर, येरवळे, गोटे, नांदलापूर, काले, उंडाळे, पार्ले, निगडी, बनवडी, पेरले, विरवडे, करवडी, कोडोली, गोवारे, बेलवडे हवेली

बुधवार दि.१० रोजी सरपंच निवड होणारी गावे :

कामथी, येणके, शिंदेवाडी (विंग), जिंती, शेणोली, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, गमेवाडी, बेलदरे, म्होप्रे, नांदगाव, महारूगडेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (उंडाळे), पाडळी केसे, टाळगाव, भुरभुशी, रिसवड, भवानवाडी, अंबवडे, खालकरवाडी, हरपळवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, मडोली निळेश्वर, चोरे, खोडशी, अबईचीवाडी, नवीन कवठे, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, बेलवडे बु., बामनवाडी, पाचुंद, चचेगाव, वसंतगड, भरेवाडी, चौगुले मळा, अक्काईचीवाडी, हणबरवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी व सुर्ली.

संबंधित गावचे निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच निवडीच्या सभेची नोटीस सर्व सदस्यांना देतील. त्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर दोन वाजता सभेस सुरुवात होईल. यानंतर प्रथम दाखल अर्जांची छाननी, अर्ज माघार व त्यानंतर एकपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्यास मतदान, अशी प्रक्रिया होणार आहे.