शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

काकांचा सत्कार; पुतण्याचा निषेध !

By admin | Updated: August 26, 2016 23:29 IST

साखर कामगार मेळावा : जरंडेश्वर व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप

वाठार स्टेशन : साखर कामगारांना १५ टक्के वेतन वाढ दिल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा जयघोष करत त्यांचा कोरेगावात जाहीर सत्कार करण्याचा निर्धार केला आहे. जरंडेश्वर शुगर मिल्स या कारखान्यातील व्यवस्थापनाकडून कामगार वर्गावर होत असलेल्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करत जरंडेश्वर शुगर मिल्सचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा अप्रत्यक्षपणे निषेध करण्याची भूमिका जिल्हा समन्वय समितीच्या निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोरेगावच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरेगाव येथील एका मंगल कार्यालयात जिल्ह्यातील साखर कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महाराष्ट्र साखर कामगार राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, रावसाहेब पाटील, दिनकरराव पाटील, जरंडेश्वर कामगार युनियनचे अध्यक्ष किरण बर्गे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, ‘राज्यातील साखर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना जरंडेश्वर मधील कामगारांच्या पाठीशी ठाम आहे. कामगारांबाबत कारखाना व्यवस्थापनाने सलोख्याची भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यातील कामगारांच्या रोषाला व्यवस्थापनाने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. साखर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून शरद पवार यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यामुळेच या कामगारांना १५ टक्के एवढी पगारवाढ मिळाली आहे. याबद्दल त्यांचा गौरव व्हावा.यावेळी जरंडेश्वर साखर कामगार युनियनचे दुष्यंत शिंदे म्हणाले, ‘साखर कारखान्यातील कामगारांना १५ टक्के एवढी पगार वाढ ही केवळ शरद पवार यांच्यामुळेच मिळाली याबद्दल त्यांचा सप्टेंबर महिन्यात कोरेगावातच जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.’जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि या खासगी व्यवस्थापनाकडून सध्या कारखान्यातील कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना मध्यंतरी कारखान्याच्या ५ ते ६ कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले तर काही कुशल कामगारांच्या बदल्या अकुशल कामगार म्हणून केल्या जात आहेत, व्यवस्थापनाने भूमिका बदलली नाही तर कामगार व्यवस्थापनाविरोधात रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाहीत. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) समन्वय समितीची महिन्याला बैठकजिल्ह्यात साखर कामगारांची एकी असावी एखाद्या कारखान्यात कामगारावर व्यवस्थापन अन्याय करत असेल तर संघटितपणे या व्यवस्थापनाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी एकत्रित आले पाहिजे, यासाठी आजच्या मेळाव्यात जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीत प्रत्येक कारखान्याचे ३ प्रतिनिधी राहणार असून, प्रत्येक महिन्याला या समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.