शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पाठीवर हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा!

By admin | Updated: October 31, 2014 23:17 IST

हव्यात नागरी सुविधा : स्थलांतर थांबण्याचा मार्ग सुकर होईल केवळ रोजगारनिर्मितीतून

राजीव मुळ्ये - सातारारस्ता नाही. दळणवळणाची साधनं उपलब्ध नाहीत. पिकवलं तरी विकायचं कुठं हा प्रश्न. कष्टाची तयारी; पण दाम मिळणार का, ही शंका. कांदाटी खोऱ्यातल्या मावळ्यांना पाठीवर फक्त हवा ‘लढ’ म्हणणारा प्रशासनाचा हात. त्यांच्यासाठी मूलभूत नागरी सुविधांची दारं आता किलकिली झाली असली, तरी निधी मिळून प्रत्यक्ष कामं सुरू होण्याची आत्यंतिक गरज आहे.‘वन-जन जोडो’ अभियानाच्या टीमने मोरणी, म्हाळुंगे, आरव, वलवण, शिंदी, चकदेव अशा दुर्गम गावातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला, तेव्हा इतर प्रकल्पग्रस्त आणि कोयना धरणग्रस्त यांच्यातला मूलभूत फरक लक्षात आला. तो म्हणजे १९७८ नंतरच्या प्रकल्पबाधितांना जो पुनर्वसन कायदा लागू आहे, तो कोयना बाधितांना नाही. त्यामुळं मूलभूत नागरी सुविधांसाठी तरतूदच नाही. काहींनी गाव सोडून अन्यत्र बस्तान बसवलं; पण जलाशयापासून वर सरकून राहिलेली गावं वर्षानुवर्षं तशीच राहिली. संस्कृती, खाणं-पिणं, पीकपद्धती सगळंच वेगळं असल्यामुळं ही माणसं दुसरीकडे स्थलांतरित झाली असती, तरी तिथं मूळ धरू शकली नसती. गाव सोडावं तरी पंचाईत, न सोडावं तरी अडचण अशी स्थिती!अभियानात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी नागरी सुविधांबाबत ग्रामस्थांना दिलेला दिलासाही कोरडा नव्हता. उठून गेलेली गावे आणि वर सरकून राहिलेल्या गावांसाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या धोरणात्मक निर्णयाचं भक्कम पाठबळ त्यांच्या आश्वासनामागे होतं. या सुविधांसाठी तब्बल शंभर कोटींची तरतूद मावळत्या सरकारनं केली आहे.पाटबंधारे विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि वन्यजीव विभाग या सर्वांचेच या मंडळींना सुविधा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू असतानाच ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू झाल्यामुळं ग्रामस्थांना दुहेरी दिलासा मिळालाय. ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’साठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील असून, प्राथमिक नागरी सुविधांच्या यादीत आतापर्यंत अठरा सुविधा होत्या, त्या आता एकवीस झाल्या आहेत. या सुविधांची चर्चा उद्याच्या भागात!