शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सर्व शेतकऱ्यांना बिलांचा एकच आकडा

By admin | Updated: September 15, 2014 00:12 IST

महावितरणचा अजब कारभार : कृषिपंपांना सरसकट ६३९ युनीटचे बिल

औंध : खटाव तालुक्यात पावसाचा अधून-मधून शिडकावा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांची गरज नसताना अव्वाच्या सव्या बिल येऊ लागले आहेत. तीन अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना सरसकट ६३९ युनीट व पाच अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना १,०६५ युनीट आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गोपूज परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औंध उपविभागाच्या गोपूज आणि परिसरातील शेतकरी कृषिपंप वापरत आहेत. कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. ज्यांच्या मीटरमध्ये अजून ६३९ रिडिंंगच झालेले नाही. त्यांनाही चक्क ६३९ युनीटप्रमाणे बिलाची आकारणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नवीन जोडणीच्या मोटारी बसवल्याच नाहीत त्यांनाही बिल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वीजवितरण कंपनीने कृषिपंपाचे बिल दिलेल्यामध्ये मीटर रिडिंगचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे आलेले बिल व प्रत्यक्षात झालेला विजेचा वापर यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना की वीजवितरण कंपनीला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. आयोगाकडून येणाऱ्या अनुदानासाठी सर्वांना एकसारखी बिले देऊन वीजवितरण कंपनीने त्यांच्यात तारतम्य नसल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे, असाही आरोप शेतकरी करत आहेत. चालू रिडिंगप्रमाणे बिले दिल्यास ते भरण्यास तयार आहेत. मात्र, न वापरलेले विजेचे बिल भरणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे.पत्रकावर दत्तात्रय घार्गे, नितीन घार्गे, विनोद पाटील, नितीन शिंदे, सुनील कुलकर्णी, मोहन खराडे, नारायण घार्गे, महादेव जाधव, संजय चव्हाण आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)