शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सर्व शेतकऱ्यांना बिलांचा एकच आकडा

By admin | Updated: September 15, 2014 00:12 IST

महावितरणचा अजब कारभार : कृषिपंपांना सरसकट ६३९ युनीटचे बिल

औंध : खटाव तालुक्यात पावसाचा अधून-मधून शिडकावा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांची गरज नसताना अव्वाच्या सव्या बिल येऊ लागले आहेत. तीन अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना सरसकट ६३९ युनीट व पाच अश्वशक्तीचे कृषिपंप वापरणाऱ्यांना १,०६५ युनीट आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गोपूज परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औंध उपविभागाच्या गोपूज आणि परिसरातील शेतकरी कृषिपंप वापरत आहेत. कृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली जात आहे. ज्यांच्या मीटरमध्ये अजून ६३९ रिडिंंगच झालेले नाही. त्यांनाही चक्क ६३९ युनीटप्रमाणे बिलाची आकारणी केली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या नवीन जोडणीच्या मोटारी बसवल्याच नाहीत त्यांनाही बिल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वीजवितरण कंपनीने कृषिपंपाचे बिल दिलेल्यामध्ये मीटर रिडिंगचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे आलेले बिल व प्रत्यक्षात झालेला विजेचा वापर यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना की वीजवितरण कंपनीला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. आयोगाकडून येणाऱ्या अनुदानासाठी सर्वांना एकसारखी बिले देऊन वीजवितरण कंपनीने त्यांच्यात तारतम्य नसल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे, असाही आरोप शेतकरी करत आहेत. चालू रिडिंगप्रमाणे बिले दिल्यास ते भरण्यास तयार आहेत. मात्र, न वापरलेले विजेचे बिल भरणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे.पत्रकावर दत्तात्रय घार्गे, नितीन घार्गे, विनोद पाटील, नितीन शिंदे, सुनील कुलकर्णी, मोहन खराडे, नारायण घार्गे, महादेव जाधव, संजय चव्हाण आदींच्या सह्या आहेत. (वार्ताहर)