शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

एकदाचं होऊनच जाऊ द्या !-- खटक्यावर बोट...

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

काँग्रेस इच्छुक आक्रमक : ‘राष्ट्रवादी’ आमदारांच्या विरोधात लढण्याचा निर्धार

सातारा : ‘काम काँग्रेसने करायचे आणि फळे राष्ट्रवादीने चाखायची. हे आता बंद झाले पाहिजे. आमचा आघाडीस विरोध आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकदा होऊन जाऊ द्या,’ अशी मागणी करत सातारा जिल्ह्यातील काँग्रेसजण राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच ही मागणी झाल्यामुळे काँग्रेसची निवडणूक समितीही थोडावेळ अवाक झाली. दरम्यान, काँग्रेसकडून ज्याला उमेदवारी दिली जाईल त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाहीदेखील या इच्छुकांनी दिली.विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यानुसार काँग्रेसने त्यांच्याकडे असणाऱ्या १७४ जागांवर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती गेल्या आठवड्यात घेतल्या. मात्र, राष्ट्रवादीकडून जास्त जागांची होणारी मागणी लक्षात घेता उर्वरित ११४ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतीही काँग्रेसने घेतल्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तेरा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आणि प्रत्येकांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे लढण्याची मागणी केली.सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघ असून यापैकी कऱ्हाड उत्तरमधून धैर्यशील कदम, विकास पाटील-शिरगावकर, अविनाश नलवडे तर कोरेगावातून किरण बर्गे, विजय कणसे आणि अविनाश फाळके यांनी मुलाखती दिल्या. पाटणमधून राहुल चव्हाण, हिंदुराव पाटील इच्छुक असून त्यांनीही काँग्रेस निवड समितीसमोर आपली भूमिका मांडली. फलटणमधून दिगंबर आगवणे आणि बाळासाहेब शिरसाट यांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येकांनी मुलाखतीदरम्यान, वेगवेगळे लढण्याची मागणी केली.काँग्रेसच्या निवड समितीने मुलाखतीदरम्यान, मतदारसंघातील सद्य:स्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर आपण लढला तर काय होऊ शकते, याची विचारणाही केली. यानंतर इच्छुकांनी आपापल्या मतदार संघाचा आढावा अगदी थोडक्यात मांडला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकदा होऊन जाऊ द्या,’ अशी मागणी केल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीकडे मतदार संघ गेला तर..?महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आणि आपण जो मतदार संघ मागितला आहे तो राष्ट्रवादीकडे गेला तर काय चित्र राहिल, याबाबतही काँग्रेसच्या इच्छुकांना विचारणा करण्यात आली. मात्र, प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्याच्या मागणीवर ठाम होते. आघाडी झाली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काम करण्याची मानसिकता नाही, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती करण्यात आली. आपणच अशी भूमिका घेतली तर जिल्ह्यातून काँग्रेसचा हाताचा पंजा दिसणार नाही, अशी भीतीही समितीपुढे व्यक्त करण्यात आली.माण, वाईतून कोणीच नाही...सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून यापैकी माण, वाई आणि कऱ्हाड दक्षिण या तीन मतदारसंघातून मुलाखतीसाठी कोणीच नव्हते. ‘कऱ्हाड दक्षिण’मधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघाचे आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मागणी अर्ज भरला असला तरी मुलाखतीला जाणे त्यांनी पसंत केलेले नाही. वाईतून तर ‘मुख्यमंत्र्यानीच या ठिकाणी लढावे,’ अशी मागणी केली गेली आहे. येथील काँग्रेसचे नेते मदन भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. येथून मुंबईला मुलाखतीसाठी कोणीच गेले नसल्यामुळे वाईत आता काँग्रेसचा नेता कोण, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.कोरेगाव विधानसभा मतदार संघाची सद्याची राजकीय परिस्थिती निवड समितीसमोर प्रामाणिकपणे मांडली. आघाडी न करता वेगळे लढलो तर कोरेगाव मतदार संघातून काँग्रेसला निश्चित यश मिळेल. आघाडी झाली तर काँग्रेसची मंडळी काम करणार नाही, असे आम्ही त्यांना ठामपणे सांगितले आहे.- विजय कणसे, कोरेगावफलटण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विरोधात लाट असून आम्ही त्याची मुद्देसूद मांडणी निवड समितीसमोर केली आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याचेच काँग्रेसच्या फायद्याचे असल्याची आमची भूमिका आम्ही मांडली आहे. वातावरण पोषक असताना आघाडी नकोच, अशी मागणी केली.- बाळासाहेब शिरसाट, फलटणउमेदवारीच्या अनुषंगाने आम्हाला मत मांडण्यास सांगण्यात आले. आम्ही आमची भूमिका मांडली. १९९९ ची निवडणूक भावनिक असल्यामुळे ते चित्र वेगळे होते, असे ठामपणे सांगितले. पाटणमध्ये काँग्रेसचे संघटन चांगले आहे. मुख्यमंत्रीही आपल्याच तालुक्यातील आहेत. त्यामुळे आम्ही उमेदवारीवर ठाम आहे. - हिंदुराव पाटील, पाटण