शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

दीनदुबळ्याचे न्यायपीठ : उदयनराजे भाेसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या शिक्षा छत्रपतींनी दिल्या होत्या. सावकारांना जरब बसावा म्हणून शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लागता कामा नये, असा आदेश दिला. यामुळेच शिवराज्य पुन्हा यावे असे आजही वाटते. याच वंशात जन्मलेले शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भाेसले हे नेहमी म्हणतात की, ‘मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून या सर्वाेच्च कुळात माझा जन्म झाला.’

छत्रपती उदयनराजेेंकडे सर्वसामान्य व दीनदुबळ्यांनी आपल्या समस्या घेऊन जायचे व महाराज त्याच्यावर लगेच ताेडगा काढणार. काेणाचे जमिनी बळकावण्याचे वाद, महिलेवर अत्याचार, गावगुंडाचा त्रास, अधिकाऱ्यांची अरेरावी, तर गरजूंना मदत याबाबत त्यांच्याकडून कधीच पुढची तारीख दिली जात नाही. अतिशय चाणाक्ष बुद्धीने जाे याेग्य त्याला जागेवरच न्याय व बदमाशाला त्यांच्या पद्धतीने दंड. या त्यांच्या स्वभावामुळे राेज राजेंच्या वाड्यावर हजाराे उपेक्षितांची गर्दी जमत असते. उदयनराजेंच्या स्वभावाबद्दल बाेलायचे झाले तर त्यांनी कधीच मी या घराण्यातील आहे म्हणून गर्व केला नाही. शेतकऱ्यांच्या पडक्या घरात जाऊन बसतील, तर कधी बांधावर जाऊन चटणी भाकरी खातील. आलिशान गाड्या असतानासुद्धा कधी रिक्षातून फिरतील, तर वेळेप्रसंगी चालतसुद्धा ज्येष्ठ दिसले तर चरणस्पर्श करणारच. बालगाेपाळांशी अगदी त्यांच्यासारखे खेळणारे म्हणजे उदयनराजे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व हसतमुख. मात्र, काेणी डिवचले तर मात्र त्याची खैर नाही. मग पुढचा व्यक्ती काेणीही असाे.

त्यांच्या निर्भीड स्वभावातूनच त्यांच्यातील छत्रपती घराण्याचे दर्शन नेहमीच हाेत असते. उदयनराजे कधीही काेणाच्या सांगण्यावरून काेणतीही गाेष्ट करत नाहीत, तर काेणाच्या प्रभावालाही बळी पडत नाहीत. त्यांचे निर्णय ते स्वत: विचारपूर्वक घेतात. त्यांची दिशा ते स्वत:च ठरवतात. काेणाच्या मागे जात नाहीत. एकदा ठरवले की ठरवले म्हणूनच त्यांचा नेहमी एक डायलाॅग असताे ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, ताे फिर मैं अपने आप की भी नही सुनता.’

सुुरक्षिततेसाठी लाेक समूहाने यात्रा करतात. समूहाने यात्रा केल्याने संकटे येत नाहीत; परंतु हाच समूह तुमची ओळख काढून घेताे. कारण तुम्ही काेणाच्यातरी सांगितलेल्या मार्गावर चालत असता. आपला मार्ग बनवण्यासाठी एकट्याने चालावे लागते. समूहात तर तारेसुद्धा चालतात; परंतु पूजा त्या सूर्याचीच हाेते. ताे एकटा चालताे, त्याला त्रास सहन करावा लागताे. संकटाचा सामना करावा लागताे. स्वत:ला आगीत झोकून द्यावे लागते आणि तेव्हाच मिळते ओळख, तेव्हाच मिळतो सन्मान, अशा आपल्या सूर्यदेवास आदिशक्ती तुळजाभवानी उदंड आयुष्य देवाे हीच प्रार्थना...!

- सागर भाेसले, सातारा