शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दीनदुबळ्याचे न्यायपीठ : उदयनराजे भाेसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या शिक्षा छत्रपतींनी दिल्या होत्या. सावकारांना जरब बसावा म्हणून शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लागता कामा नये, असा आदेश दिला. यामुळेच शिवराज्य पुन्हा यावे असे आजही वाटते. याच वंशात जन्मलेले शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भाेसले हे नेहमी म्हणतात की, ‘मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून या सर्वाेच्च कुळात माझा जन्म झाला.’

छत्रपती उदयनराजेेंकडे सर्वसामान्य व दीनदुबळ्यांनी आपल्या समस्या घेऊन जायचे व महाराज त्याच्यावर लगेच ताेडगा काढणार. काेणाचे जमिनी बळकावण्याचे वाद, महिलेवर अत्याचार, गावगुंडाचा त्रास, अधिकाऱ्यांची अरेरावी, तर गरजूंना मदत याबाबत त्यांच्याकडून कधीच पुढची तारीख दिली जात नाही. अतिशय चाणाक्ष बुद्धीने जाे याेग्य त्याला जागेवरच न्याय व बदमाशाला त्यांच्या पद्धतीने दंड. या त्यांच्या स्वभावामुळे राेज राजेंच्या वाड्यावर हजाराे उपेक्षितांची गर्दी जमत असते. उदयनराजेंच्या स्वभावाबद्दल बाेलायचे झाले तर त्यांनी कधीच मी या घराण्यातील आहे म्हणून गर्व केला नाही. शेतकऱ्यांच्या पडक्या घरात जाऊन बसतील, तर कधी बांधावर जाऊन चटणी भाकरी खातील. आलिशान गाड्या असतानासुद्धा कधी रिक्षातून फिरतील, तर वेळेप्रसंगी चालतसुद्धा ज्येष्ठ दिसले तर चरणस्पर्श करणारच. बालगाेपाळांशी अगदी त्यांच्यासारखे खेळणारे म्हणजे उदयनराजे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व हसतमुख. मात्र, काेणी डिवचले तर मात्र त्याची खैर नाही. मग पुढचा व्यक्ती काेणीही असाे.

त्यांच्या निर्भीड स्वभावातूनच त्यांच्यातील छत्रपती घराण्याचे दर्शन नेहमीच हाेत असते. उदयनराजे कधीही काेणाच्या सांगण्यावरून काेणतीही गाेष्ट करत नाहीत, तर काेणाच्या प्रभावालाही बळी पडत नाहीत. त्यांचे निर्णय ते स्वत: विचारपूर्वक घेतात. त्यांची दिशा ते स्वत:च ठरवतात. काेणाच्या मागे जात नाहीत. एकदा ठरवले की ठरवले म्हणूनच त्यांचा नेहमी एक डायलाॅग असताे ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, ताे फिर मैं अपने आप की भी नही सुनता.’

सुुरक्षिततेसाठी लाेक समूहाने यात्रा करतात. समूहाने यात्रा केल्याने संकटे येत नाहीत; परंतु हाच समूह तुमची ओळख काढून घेताे. कारण तुम्ही काेणाच्यातरी सांगितलेल्या मार्गावर चालत असता. आपला मार्ग बनवण्यासाठी एकट्याने चालावे लागते. समूहात तर तारेसुद्धा चालतात; परंतु पूजा त्या सूर्याचीच हाेते. ताे एकटा चालताे, त्याला त्रास सहन करावा लागताे. संकटाचा सामना करावा लागताे. स्वत:ला आगीत झोकून द्यावे लागते आणि तेव्हाच मिळते ओळख, तेव्हाच मिळतो सन्मान, अशा आपल्या सूर्यदेवास आदिशक्ती तुळजाभवानी उदंड आयुष्य देवाे हीच प्रार्थना...!

- सागर भाेसले, सातारा