शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

By admin | Updated: March 11, 2017 10:30 IST

हमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडले

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोलहमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडलेकातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या रामाच्या पारात, सध्या पहाटेच्या वेळी बळीराजांची साद ऐकायला मिळत आहे. यंदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची कापणी सुरू असून, गहू-हरभऱ्याचेही दर ढासळले आहे. यावर्षी उत्पादन जादा झाल्यामुळे ज्वारी १८०० ते २००० रुपये प्रतिक्वि ंटल तर दुसरीकडे भरल्या गाडीला चिपाडाचं काय ओझ, अशी कडब्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.रब्बी हंगामासाठी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ज्वारी असो अथवा अन्य कडधान्य उत्पादन भरघोस निघणार असल्याचे चिन्ह दिसून आले की व्यापारीवर्ग दर ढासळून ठेवणार ही ह्यकाळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे शेतक ऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ह्यआवक वाढवावी तर चावतंय... न वाढवावी तर पळतंय,ह्ण अशी अवस्था झाली आहे. चार वर्षांच्या दुष्काळी वातावरणानंतर शेतकऱ्यांसाठी ज्वारीची भाकरी गोड लागणार असली तरी मालाची आवक वाढल्याने हमीभाव घसरला गेला आहे.तालुक्याच्या या पूर्व पट्यातल्या शेतक ऱ्यांच्या जमिनी म्हणजे पावसाच्या भरवशावरच्या जमिनी त्यामुळे सर्व खर्च भागून पदरी काही तरी पडावे, अशी अशा बाळगून बसलेल्या शेतक ऱ्यांच्या हाती प्रत्येकवर्षी चमत्कार घडत असतो. ह्यगेल्या हंगामात शेतक ऱ्यांच्या हाती नुसतं बाटूक ज्वारीचं उत्पादन फारच कमी..तर या हंगामात बाटुकाला भाव आला असून, ज्वारीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षी ज्वारीच्या विक्रमी उत्पादनामुळे कडब्याचेही उत्पादन वाढले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न थोडक्यात मिटणार आहे. मागे वळून पाहता चारा छावण्यांच्या काळात अनेक राज्यकर्त्यांनी हात धुवून घेतले असले तरी गत काही वर्षांत छावण्यांची आवश्यकता भासत नसल्याचे दिसून येत आहे. कडब्यामुळे शेतकरी समाधानी असला तरी ह्यकभी खुशी कभी गमह्ण अशी अवस्था ज्वारी उत्पादकांची होणार आहे. अशाप्रकारे यंदा भरघोस उत्पादन झाल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी भाव कोसळल्यामुळे गणितच कोलमडल्या सारखे झालं आहे. (वार्ताहर)जुनी प्रथा लोप पावतेयअनेक प्रकारच्या पिकांची काढणी, मळणीची काम यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहे. आता बाजारात नवनवीन कृषियंत्र येऊ लागल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या मशागती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, लोहार या कारागिरांची कला लोप पावतं चालल्यामुळे जुन्या प्रथा हळूहळू मोडीत निघत आहेत.विळं मोडून खिळं करण्याची वेळ.. शेतकऱ्यांना मालाचा हमीभाव स्थिर राहिला पाहिजे. नक्की प्रशासन व्यापाऱ्यांच्या आड दडतंय की व्यापारी प्रशासनांच्या आड दडतायेत हेच कोडं शेतक ऱ्यांला अजून उलगडत नसल्यामुळे शेतकरी ह्यना घर का ना घाट काह्ण झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात नक्की कोणती पिकं करावीत ते तरी सांगा. शेतक ऱ्याने उत्पादन वाढवलं की व्यापाऱ्याला निमित्त झालं म्हणून समजा दर ढासळून ठेवायला. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळावा जेणेकरून ह्यविळं मोडून खिळंह्ण करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.- नामदेव बागल, शेतकरी, कातरखटाव