शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोल

By admin | Updated: March 11, 2017 10:30 IST

हमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडले

ज्वारीला दर काडीमोड... गहू-हरभराही मातीमोलहमीभाव घसरला : उत्पादन वाढले मात्र दराचे गणित कोलमडलेकातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या रामाच्या पारात, सध्या पहाटेच्या वेळी बळीराजांची साद ऐकायला मिळत आहे. यंदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची कापणी सुरू असून, गहू-हरभऱ्याचेही दर ढासळले आहे. यावर्षी उत्पादन जादा झाल्यामुळे ज्वारी १८०० ते २००० रुपये प्रतिक्वि ंटल तर दुसरीकडे भरल्या गाडीला चिपाडाचं काय ओझ, अशी कडब्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.रब्बी हंगामासाठी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ज्वारी असो अथवा अन्य कडधान्य उत्पादन भरघोस निघणार असल्याचे चिन्ह दिसून आले की व्यापारीवर्ग दर ढासळून ठेवणार ही ह्यकाळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यामुळे शेतक ऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ह्यआवक वाढवावी तर चावतंय... न वाढवावी तर पळतंय,ह्ण अशी अवस्था झाली आहे. चार वर्षांच्या दुष्काळी वातावरणानंतर शेतकऱ्यांसाठी ज्वारीची भाकरी गोड लागणार असली तरी मालाची आवक वाढल्याने हमीभाव घसरला गेला आहे.तालुक्याच्या या पूर्व पट्यातल्या शेतक ऱ्यांच्या जमिनी म्हणजे पावसाच्या भरवशावरच्या जमिनी त्यामुळे सर्व खर्च भागून पदरी काही तरी पडावे, अशी अशा बाळगून बसलेल्या शेतक ऱ्यांच्या हाती प्रत्येकवर्षी चमत्कार घडत असतो. ह्यगेल्या हंगामात शेतक ऱ्यांच्या हाती नुसतं बाटूक ज्वारीचं उत्पादन फारच कमी..तर या हंगामात बाटुकाला भाव आला असून, ज्वारीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षी ज्वारीच्या विक्रमी उत्पादनामुळे कडब्याचेही उत्पादन वाढले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न थोडक्यात मिटणार आहे. मागे वळून पाहता चारा छावण्यांच्या काळात अनेक राज्यकर्त्यांनी हात धुवून घेतले असले तरी गत काही वर्षांत छावण्यांची आवश्यकता भासत नसल्याचे दिसून येत आहे. कडब्यामुळे शेतकरी समाधानी असला तरी ह्यकभी खुशी कभी गमह्ण अशी अवस्था ज्वारी उत्पादकांची होणार आहे. अशाप्रकारे यंदा भरघोस उत्पादन झाल्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी भाव कोसळल्यामुळे गणितच कोलमडल्या सारखे झालं आहे. (वार्ताहर)जुनी प्रथा लोप पावतेयअनेक प्रकारच्या पिकांची काढणी, मळणीची काम यंत्राच्या साह्याने होऊ लागली आहे. आता बाजारात नवनवीन कृषियंत्र येऊ लागल्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या मशागती होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार, लोहार या कारागिरांची कला लोप पावतं चालल्यामुळे जुन्या प्रथा हळूहळू मोडीत निघत आहेत.विळं मोडून खिळं करण्याची वेळ.. शेतकऱ्यांना मालाचा हमीभाव स्थिर राहिला पाहिजे. नक्की प्रशासन व्यापाऱ्यांच्या आड दडतंय की व्यापारी प्रशासनांच्या आड दडतायेत हेच कोडं शेतक ऱ्यांला अजून उलगडत नसल्यामुळे शेतकरी ह्यना घर का ना घाट काह्ण झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात नक्की कोणती पिकं करावीत ते तरी सांगा. शेतक ऱ्याने उत्पादन वाढवलं की व्यापाऱ्याला निमित्त झालं म्हणून समजा दर ढासळून ठेवायला. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळावा जेणेकरून ह्यविळं मोडून खिळंह्ण करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.- नामदेव बागल, शेतकरी, कातरखटाव