शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

ंसायकलवरून तेरा दिवसांत १४०० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:03 IST

मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘ पर्यावरण वाचवा , प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले.कन्याकुमारीला जाण्यासाठी आठरा दिवसांपूर्वी सायकलवरून प्रस्थान केले होते. हे आंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींवरून ...

मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘पर्यावरण वाचवा, प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले.कन्याकुमारीला जाण्यासाठी आठरा दिवसांपूर्वी सायकलवरून प्रस्थान केले होते. हे आंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींवरून तेरा दिवस लागले. या दिवसामध्ये बेंगलोर, मदुराई, सेलमयासह दक्षिण भारतात व्यवसायानिमित्त असलेल्या मराठी माणसांनी त्यांचे स्वागत केले.केवळ सायकल चालवून हा विक्रम करण्याचा उद्देश न ठेवता वाहनांमुळे प्रदूषण होत आहे. पर्यावरणाचाही ºहास होत चालला आहे. ‘सायकल चालवा पर्यावरणाचा समतोल राखा,’ असे विविध संदेश सायकलवर लिहिले होते. परतीचा प्रवास रेल्वेने करून ते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मायणी येथे पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत हार, बुफे देऊन मिठाई भरवून स्वागत केले.अनिल कुलकर्णी, अंबरीश जोशी, मिलिंद कुलकर्णी, सागर माळवदे या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे चार सदस्यही आहेत. कन्याकुमारी येथे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी मंदिर त्यानंतर रामेश्वरम् येथील धनुष्यकोटी हे रामसेतू बांधलेले ठिकाण, मीनाक्षी मंदिर येथे दर्शन घेऊन कन्याकुमारी ते मिरज हा प्रवास रेल्वेने केला. मिरज येथेही तेथील सायकल व पर्यावरणप्रेमी ग्रुप, सह्याद्री ग्रुप तर्फे शाल श्रीफळ गुलाबपुष्प व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.मायणीत उपसरपंच सूरज पाटील, वडूज बाजार समितीचे संचालक किरण देशमुख, किरण कवडे, रणजित माने, हेमंत जाधव, शंकर माळी, चंदन वरुडे, राजेंद्र बाबर, राजाराम कचरे, शंकर भिसे, कृषी अधिकारी दीपक घोणे, सोमनाथ माळी, जयंत लिपारे, मधुकर लिपारे, आबासाहेब माने, सचिन घाडगे, प्रशांत कवडे, प्रमोद महामुनी, डॉ. सुमनकुमार देवनाथ, अश्विन माळी, अशोक कुंबलवर, जगन्नाथ भिसे यांनी स्वागत केले.इतर सायकलस्वारांनी घेतली भेटगतवर्षी मायणी ते बालाजी हे अंतर कमी वेळात पार करून मायणीचा रायडर अशी प्रसिद्धी मिळवलेले पत्रकार सुमित ऊर्फ दत्ता कोळी व शाम कवडे यांनी यावर्षी मायणी ते कन्याकुमारी हे १४०० किलोमीटरचे अंतर पार करून या सायकलस्वारांची प्रत्यक्ष कन्याकुमारीत भेट घेतली.