शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पालिका शाळांमध्येही आता ‘जॉनी जॉनी यस पप्पा’चे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:46 IST

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा खालावत चालला असताना साताऱ्यात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा खालावत चालला असताना साताऱ्यात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. अठरापैकी दोन शाळांमध्ये प्रथमच प्ले ग्रुप तर पंधरा शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमिक शाळांमध्येही आता ‘जॉनी जॉनी यस पप्पा’चे सूर घुमू लागले आहेत.शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे, त्यामुळे पालिका व जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शासनाकडून राज्यातील अनेक शाळा बंदही करण्यात आल्या. पालकांचाही मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याकडे अधिक कल आहे.या सर्व परिस्थितीचा आढावा घेत सातारा पालिकेने पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक दोन व सदर बझार येथील उर्दू शाळा क्रमांक बारा येथे प्रथमच प्ले ग्रुप सुरू करण्यात आले आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात ३० तर उर्दू शाळेत ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या व्यतिरिक्त अठरा शाळांपैकी पंधरा शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले असून, प्रत्येक शाळेसाठी एका अशा पंधरा शिक्षकांची नियुक्तीही केली आहे. ही सर्व जबाबदारी महिला शिक्षकांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.पालिकेच्या शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांचाही पालिका शाळांकडे बघण्याचा कल आता बदलत चालला आहे. इंग्रजी माध्यमिक शाळांप्रमाणेच विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे प्रयत्न शिक्षकांकडून केले जात आहे.डिजिटल क्लासरूमची गरजपालिकेच्या अठरापैकी केवळ सहा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उर्वरित शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. काही शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खिडक्या, कौले, पत्रे तुटले असून, पावसाळ्यात या शाळांमध्ये पावसाचे पाणी गळते. पालिका प्रशासनाने शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करताना या समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.ज्ञानवर्धिनी विद्या मंदिराची पटसंख्या दुप्पटपालिका शाळेच्या इतिहासात प्रथमच ‘प्ले ग्रुप’चा प्रयोग राबविण्यात आल्याने पटसंख्येही वाढ झाली आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिराची पहिली ते चौथी पर्यंतची पटसंख्या ४० वरून आता ८४ वर पोहचली आहे. पुढील वर्षी ती दुप्पट करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे.