शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

घरोघरी झळकली ‘जिजाऊंच्या लेकीची’ पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान अमूल्य असे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान अमूल्य असे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातारा जिल्ह्यातील चार गावांमध्ये ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोखा सन्मान करण्यात आला. गावातील प्रत्येक घरावर ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली.

आज देशात अत्याचारांच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. हिंसा, ढासळलेली नैतिकता, नीतिमूल्यांचा आणि संस्कार संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. आज हे विदारक चित्र दररोज कुठे ना कुठे तरी वाचण्यात, ऐकण्यात, पाहण्यात येतंच असतं. तेव्हा मनांत एक वादळं उठतं आणि आपोआप मुखातून शब्द बाहेर येतात ‘महाराज तुम्ही परत या’. खरोखरच छत्रपती शिवरायांना परत आणायचं असेल तर आपल्याला अगोदर जिजाऊंचा त्यांच्या लेकींचा सन्मान करायला हवा. याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायला हवी. आपल्या मुलींमध्ये आपल्याला ‘जिजाऊं’ना पाहायला हवं. कारण तिच्यातच नवनिमार्णाचं सामर्थ्य आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जयहिंद फाऊंडेशनने जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘चला जिजाऊ घडवूया’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

वाई तालुक्यातील अनपटवाडी व गुळूंब, जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी, तर खटाव तालुक्यातील डिस्कळ या गावात ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. येथील घरोघरी ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश तर ज्या घरात मुलगा आहे त्या घरावर ‘स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा, मुलाचे नाव व चला विवेकानंद घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली. जयहिंद फाऊंडेशनचे सचिव हणुमंत मांढरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विशेष बाब म्हणजे फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीगोंदा येथील मंगल नांगरे यांनी २६२ अंगणवाडी केंद्रात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

(कोट)

या उपक्रमामुळे मुली, तसेच पालकांच्या मनात नव प्रेरणा निर्माण झाली आहे. प्रत्येक घरावर मुलगी व मुलाच्या नावाची पाटी झळकली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार मनामनांत व घराघरांत रुजविण्याचे प्रयत्न जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत.

- उमेश मोरे, मुख्याध्यापक

दुदुस्करवाडी प्राथमिक शाळा,

(कोट)

प्रत्येक मुलीने राजमाता जिजाऊ व मुलाने स्वामी विवेकानंद बनण्याची गरज आहे. आज त्यांच्याच विचाराची समाजाला गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये परिवर्तनाचे बीज रुजवायला हवेत. तरच समाजाचा, आपला उत्कृर्ष होईल.

- संस्कृती दळवी, डिस्कळ

फोटो : १३ जिजाऊ ०१/०२

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जावळी तालुक्यातील दुदुरस्करवाडी व खटाव तालुक्यांतील डिस्कळ येथील घरांवर ‘मुलीचे नाव असलेली व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश देणारी पाटी लावण्यात आली आहे.