शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
4
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
5
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
6
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
7
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
8
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
9
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
10
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
11
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
12
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
14
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
15
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
16
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
17
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
18
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
19
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
20
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी झळकली ‘जिजाऊंच्या लेकीची’ पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान अमूल्य असे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊंचे योगदान अमूल्य असे आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातारा जिल्ह्यातील चार गावांमध्ये ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोखा सन्मान करण्यात आला. गावातील प्रत्येक घरावर ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली.

आज देशात अत्याचारांच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. हिंसा, ढासळलेली नैतिकता, नीतिमूल्यांचा आणि संस्कार संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. आज हे विदारक चित्र दररोज कुठे ना कुठे तरी वाचण्यात, ऐकण्यात, पाहण्यात येतंच असतं. तेव्हा मनांत एक वादळं उठतं आणि आपोआप मुखातून शब्द बाहेर येतात ‘महाराज तुम्ही परत या’. खरोखरच छत्रपती शिवरायांना परत आणायचं असेल तर आपल्याला अगोदर जिजाऊंचा त्यांच्या लेकींचा सन्मान करायला हवा. याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायला हवी. आपल्या मुलींमध्ये आपल्याला ‘जिजाऊं’ना पाहायला हवं. कारण तिच्यातच नवनिमार्णाचं सामर्थ्य आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जयहिंद फाऊंडेशनने जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘चला जिजाऊ घडवूया’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

वाई तालुक्यातील अनपटवाडी व गुळूंब, जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी, तर खटाव तालुक्यातील डिस्कळ या गावात ‘जिजाऊंच्या लेकींचा’ अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. येथील घरोघरी ‘जिजाऊंची प्रतिमा, मुलीचे नाव व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश तर ज्या घरात मुलगा आहे त्या घरावर ‘स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा, मुलाचे नाव व चला विवेकानंद घडवूया’ असा संदेश लिहिलेली पाटी लावण्यात आली. जयहिंद फाऊंडेशनचे सचिव हणुमंत मांढरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विशेष बाब म्हणजे फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीगोंदा येथील मंगल नांगरे यांनी २६२ अंगणवाडी केंद्रात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

(कोट)

या उपक्रमामुळे मुली, तसेच पालकांच्या मनात नव प्रेरणा निर्माण झाली आहे. प्रत्येक घरावर मुलगी व मुलाच्या नावाची पाटी झळकली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार मनामनांत व घराघरांत रुजविण्याचे प्रयत्न जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत.

- उमेश मोरे, मुख्याध्यापक

दुदुस्करवाडी प्राथमिक शाळा,

(कोट)

प्रत्येक मुलीने राजमाता जिजाऊ व मुलाने स्वामी विवेकानंद बनण्याची गरज आहे. आज त्यांच्याच विचाराची समाजाला गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये परिवर्तनाचे बीज रुजवायला हवेत. तरच समाजाचा, आपला उत्कृर्ष होईल.

- संस्कृती दळवी, डिस्कळ

फोटो : १३ जिजाऊ ०१/०२

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जावळी तालुक्यातील दुदुरस्करवाडी व खटाव तालुक्यांतील डिस्कळ येथील घरांवर ‘मुलीचे नाव असलेली व चला जिजाऊ घडवूया’ असा संदेश देणारी पाटी लावण्यात आली आहे.