शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

अडीचशे कुटुंबांवर फिरणार जेसीबी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:12 IST

लोणंद : लोणंद येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी आता शेवटची संधी म्हणून दोन ...

लोणंद : लोणंद येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी आता शेवटची संधी म्हणून दोन दिवसांची वेळ दिली आहे. यासंदर्भातील जाहीर नोटीस फ्लेक्सद्वारे ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. यामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.३० नोब्हेंबरला पोलिसांच्या फौजफाट्यात जेसीबीच्या साह्याने ही जागा खाली करण्यात येणार असल्याचे लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे फ्लेक्स या भागात ठिकठिकाणी लावण्यात या भागात राहणाºया दोनशे पन्नास कुटुंबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.लोणंद रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून २५० पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी आपले संसार थाटले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, डोंबर वस्ती, वडार वस्ती व घिसाडी समाजाचे वास्तव्य आहे. यामधील बहुतांश कुटुंबे अतिशय गरीब असून, अनेकांची रोजची पोटाची खळगी भरण्याचीही भ्रांत आहे.या भागात असणारी आंबेडकर कॉलनीतील घरे ही कच्च्या दगड विटांची, पत्र्याची आहेत, तर डोंबारवस्ती येथील घरे कपड्याचे पाल करून बांधण्यात आलेली आहेत. येथे राहणाºया अनेकांची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी झाली आहे. त्यावेळी ग्रामपंचायतीने त्यांना लाईट व पाण्याचे कनेक्शनही दिलेली आहेत. मात्र, अचानक रेल्वे प्रशासनाने या भागात पॉवर हाऊसची उभारणी करण्यासाठी या जागेत राहणाºया कुटुंबांना गेल्या सहा महिन्यांपासून जागा खाली करण्यासाठी तगादा लावला आहे. यासंदर्भात तशा लेखी नोटिसा दिल्या होत्या. या बेघर होणाºया कुटुंबांनी त्यावेळी खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना भेटून पर्यायी जागा मिळण्यासाठी प्रयत्नही केले होते, यासंदर्भात उपोषण व आंदोलनही करण्यात आले होते.रेल्वे प्रशासनाला पर्यायी जागा मिळेपर्यंत जागा खाली करण्यात येऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या बेघरांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. आता मात्र रेल्वेकडून वैयक्तिक नोटीस न देता फ्लेक्सच्या साह्याने जाहीर नोटीस बोर्ड ठिकठिकाणी लावण्यात आले असून, ३० तारखेपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आलीआहे.अजून काही दिवसांचीमुदत देण्याची मागणी३० तारखेला पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने जागा खाली करण्यात येणार असल्याचा स्पष्ट उल्लेखच केला आहे. यात २५० कुटुंबाचे धाबे दणाणले आहेत. ही बेघर होणारी कुटुंबे सैरभैर होऊन पर्यायी जागा मिळण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. पर्यायी जागा मिळेपर्यंत रेल्वेने आम्हाला आणखी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.