शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

अडीचशे कुटुंबांवर फिरणार जेसीबी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:12 IST

लोणंद : लोणंद येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी आता शेवटची संधी म्हणून दोन ...

लोणंद : लोणंद येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी आता शेवटची संधी म्हणून दोन दिवसांची वेळ दिली आहे. यासंदर्भातील जाहीर नोटीस फ्लेक्सद्वारे ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. यामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.३० नोब्हेंबरला पोलिसांच्या फौजफाट्यात जेसीबीच्या साह्याने ही जागा खाली करण्यात येणार असल्याचे लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे फ्लेक्स या भागात ठिकठिकाणी लावण्यात या भागात राहणाºया दोनशे पन्नास कुटुंबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.लोणंद रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून २५० पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी आपले संसार थाटले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, डोंबर वस्ती, वडार वस्ती व घिसाडी समाजाचे वास्तव्य आहे. यामधील बहुतांश कुटुंबे अतिशय गरीब असून, अनेकांची रोजची पोटाची खळगी भरण्याचीही भ्रांत आहे.या भागात असणारी आंबेडकर कॉलनीतील घरे ही कच्च्या दगड विटांची, पत्र्याची आहेत, तर डोंबारवस्ती येथील घरे कपड्याचे पाल करून बांधण्यात आलेली आहेत. येथे राहणाºया अनेकांची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी झाली आहे. त्यावेळी ग्रामपंचायतीने त्यांना लाईट व पाण्याचे कनेक्शनही दिलेली आहेत. मात्र, अचानक रेल्वे प्रशासनाने या भागात पॉवर हाऊसची उभारणी करण्यासाठी या जागेत राहणाºया कुटुंबांना गेल्या सहा महिन्यांपासून जागा खाली करण्यासाठी तगादा लावला आहे. यासंदर्भात तशा लेखी नोटिसा दिल्या होत्या. या बेघर होणाºया कुटुंबांनी त्यावेळी खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना भेटून पर्यायी जागा मिळण्यासाठी प्रयत्नही केले होते, यासंदर्भात उपोषण व आंदोलनही करण्यात आले होते.रेल्वे प्रशासनाला पर्यायी जागा मिळेपर्यंत जागा खाली करण्यात येऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या बेघरांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. आता मात्र रेल्वेकडून वैयक्तिक नोटीस न देता फ्लेक्सच्या साह्याने जाहीर नोटीस बोर्ड ठिकठिकाणी लावण्यात आले असून, ३० तारखेपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आलीआहे.अजून काही दिवसांचीमुदत देण्याची मागणी३० तारखेला पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने जागा खाली करण्यात येणार असल्याचा स्पष्ट उल्लेखच केला आहे. यात २५० कुटुंबाचे धाबे दणाणले आहेत. ही बेघर होणारी कुटुंबे सैरभैर होऊन पर्यायी जागा मिळण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. पर्यायी जागा मिळेपर्यंत रेल्वेने आम्हाला आणखी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.