शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

‘लक्ष्मी तोट्या’पेक्षाही ‘जयाभाव’चा सुतळी बॉम्ब जोरात!

By admin | Updated: October 20, 2014 22:34 IST

माण-खटाव : सर्व अंदाज फोल ठरवत मागील निवडणुकीपेक्षा पाचपट मताधिक्य

सचिन मंगरूळे -म्हसवड  -म्हसवड : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले होते. येथील पंचरंगी लढतीत विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी पाचपट मताधिक्याने बाजी मारल्याने येथील स्वाभिमानी जनतेने आश्वासक नेतृत्व विकासकामांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले, तर ‘नमो’ लाटेवर स्वार होत महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरेंनी लढत देत दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली. गेली ४० वर्षे माणच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ असणाऱ्या सदाशिवराव पोळ यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेचे रणजित देशमुख व अपक्ष अनिल देसाई यांचा करिश्मा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. माण-खटावमध्ये फक्त जयकुमार यांचीच जादू चालली व पुन्हा एकदा ‘जय हो’चीच लाट असल्याचे निकालावरून स्पष्ट होते. माण विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यामध्ये प्रमुख पंचरंगी लढत झाली. या निवडणुकीत प्रमुख पाच मातब्बर उमेदवारांनी प्रचारात वापरावयाच्या सर्व आयुधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याने या मतदार संघातील निकालाबाबत छातीठोकपणे कोण निवडणूक जिंकणार? हे राजकीय पंडितांनाही अंदाज वर्तविता येत नव्हता. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते आमच्या नेत्याला इतकी हजार मते पडणार? तितकी हजार मते पडणार? या कार्यकर्त्यांचे आकड्यांची बेरीज केली तर झालेल्या मतदानाच्या दुप्पट होत होती; परंतु सर्व अंदाज फोल ठरवत मागील निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा पाचपट मताधिक्य मिळवत आमदार जयकुमार गोरे यांनी माण खटावचे मैदान जिंकले. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासूनच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली होती. पक्षाच्या तिकिटावर अथवा अपक्ष निवडणूक लढवणारच, असा दृढ निश्चय करीत दोन्ही तालुक्यांतील गावे वाडी-वस्ती पिंजून काढली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि आघाडीत बिघाडी झाली व महायुती तुटल्यामुळे येथील इच्छुक उमेदवारांना विविध पक्षांचा आश्रय घेत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले.राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी आमदार जयकुमार गोरेंची पहिल्यांदा निश्चित झाली होती; परंतु घटक पक्ष व राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या उमेदवारीचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांपर्यंत सुरू होता. शेवटच्या एक-दोन दिवसांत उमेदवारीचा घोळ मिटला. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेखर गोरे, राष्ट्रवादीकडून माजी आमदार सदाशिवराव पोळ, शिवसेनेकडून रणजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.दुसरीकडे गत ४० वर्षे माणच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे ‘किंगमेकर’ सदाशिवराव पोळ यांना जनतेतून निवडून येऊन किंग होण्याचे स्वप्न याही निवडणुकीत अपूर्णच राहिले. यावेळची शेवटची निवडणूक लढवत असल्याचे भावनिक आवाहन करत मागील ४० वर्षांत केलेल्या विकासकामांवर ते निवडणुकीस सामोरे गेले होते.पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविताना अनेकांचे अंदाज फोल ठरवत चांगलीच मुसंडी मारली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत पहिल्या प्रयत्नातच दुसऱ्या क्रमांकाची झेप घेतली. त्यांनी ‘आंधळी पॅटर्न’ जसा आंधळी गणात विकासकामांचा राबविला, तसा ‘आंधळी पॅटर्न’ माण-खटाव तालुक्यांतील प्रत्येक गावात राबविणार तसेच भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षितता हे मुद्दे घेऊन तरुणांना आकर्षित करून त्यांनी या निवडणुकीत चांगलेच रंगतदार चित्र निर्माण केले.हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. खटाव तालुक्यातील एकमेव उमेदवार असल्याने खटावची अस्मिता म्हणून खटाव तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु या आशा पूर्णत: फोल ठरल्या. त्यांनी दुष्काळी माण-खटावमध्ये औद्योगिक क्रांती, वाढती बेरोजगारी, पाणीप्रश्न, दहशत हे मुद्दे घेऊन निवडणुकीस सामोरे गेले होते. माणच्या जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे तर खटाव तालुक्याने अपेक्षित साथ न दिल्याचे निकालावर स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सहा महिन्यांपूर्वीपासूनच सुरू केली होती. त्यांनी माण-खटाव तालुका पिंजून काढत निवडणूक लढविणारच पक्ष अथवा पक्षाशिवाय; परंतु त्यांना पक्षाच्या वतीने तिकीट मिळेल, अशी आशा होती. परंतु पक्ष नेतृत्वाने त्यांना डावलून सदाशिवराव पोळ यांना उमेदवारी दिली. त्यांनी आजवर १५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत केलेली जनतेची कामे, लोकांच्यात मिसळणारा नेता, सर्व स्तरातील लोकांच्या सुख दु:खात सामील होऊन आजवर केलेल्या जनतेच्या सेवा व पुढील काळात माण-खटावचा विकास कसा झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन निवडणूक लढविली.एकूणच या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनी, मसल पॉवर, आक्रमक प्रचार, हायटेक प्रचारयंत्रणा राबविल्यामुळे निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र होते. प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांची फोडाफोडी मोठ्या प्रमाणावर झाली; परंतु अटीतटीच्या लढतीत आमदार जयकुमार गोरे यांनी बाजी मारल्याने जिल्ह्याच्या राजकारणातील दबदबा आ. जयकुमार गोरे यांच्यामुळे कायम राहणार हे स्पष्ट असल्याचे निकालाने दर्शविले आहे.जिंकल्याचे कारणमतदार संघातील संपर्क आणि पाणी आणण्याची आश्वासन पूर्ती. आश्वासक नेतृत्व विकास कामांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसले.