शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जावळी दोन महिन्यांच्या तुलनेत बाधितांचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST

कुडाळ : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत नव्याने कोरोना रुग्णांची भर पडली होती. मात्र, आरोग्य ...

कुडाळ : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत नव्याने कोरोना रुग्णांची भर पडली होती. मात्र, आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत मार्च महिन्यात तालुक्यात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. असे असले तरीही नागरिकांनी सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी आता वर्ष होत आले तरी सुरूच आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. यातच गेल्या दोन महिन्यांत जावळी तालुक्यातील वाढणारी रुग्णसंख्या या पंधरा दिवसांत आटोक्यात आली आहे. या पंधरवड्यात २२ जण बाधित आले असून, एकजण दगावला आहे. तसेच २९ जण सक्रिय रुग्ण आहेत. सुरुवातीच्या काळात वाढलेले मृत्यूचे प्रमाणही आता कमी झाले आहे. वाढणारी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.

तालुक्यात शासनाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजअखेर आरोग्य विभागातील ७९१, महसूल २५९, ग्रामपंचायत ४६०, वनविभाग ३२, तर कृषी विभागातील ४२ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचारी व प्राथमिक शिक्षकांना लसीकरण केलेले आहे. तसेच गृह विभागाच्या ४८ जण याचबरोबर ४५ ते ५९ वर्षे असणाऱ्या व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील सुमारे १३० सामान्य नागरिकांनाही लसीकरण झाले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आठवडे बाजार, लग्न समारंभ, यात्रा, धार्मिक कार्यक्रम या ठिकणी अनावश्यक गर्दी करू नये. कोरोना संपला असे न वागता मास्कचा वापर करावा. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे.

कोट :

तालुक्यात दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आरोग्य विभागाचे यावर बारकाईने लक्ष ठेवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. तरीही नागरिकांनी विनामास्क फिरू नये, सामाजिक आंतराचे पालन करावे आणि वारंवार साबणाने हात धुवावेत. अनावश्यक गर्दीही करू नये. स्वतः आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. सद्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५ ते ५९ वर्षे असणाऱ्या व्याधीग्रस्त आणि ६९ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू असून, आता सोमवार ते शनिवार संपूर्ण आठवडाभर लसीकरण होणार आहे.

- डॉ. भगवान मोहिते,

जावळी तालुका वैद्यकीय अधिकारी.