शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: July 13, 2017 14:56 IST

हालचाली गतिमान : केळघर, आनेवाडीचा समावेश

आॅनलाईन लोकमतमेढा (जि. सातारा), दि. १३ : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता होऊ घातलेल्या १७ ग्रामपंचायतींवर थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. बालेकिल्ला म्हणून जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप उतरणार काय याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. या १७ ग्रामपंचायतींमध्ये केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी या राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जावळी तालुक्यात केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी, मोरघर, वालुथ, रामवाडी, सोमर्डी, घोटेघर, वाकी, रुईघर, नांदगणे, शिंदेवाडी, ओझरे, रिटकवली आदी १७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हरकतींवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

३ आॅगस्ट रोजी अंतर्गत प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. याबाबत हरकती ११ जुलैपर्यंत जावळी तहसील कार्यालयात स्वीकारण्यात आल्या आहेत.यावेळी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने नागरिकांच्यातही उत्सुकता वाढली आहे. तालुक्यातील केळघर, कुसुंबी, आनेवाडी, अखाडे, करहर या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण होणार? याबरोबरच ही निवडणूक पक्षीय स्तरावर होणार की गट-तटाची याबाबत जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे.

जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, शिवसेना व भाजपदेखील जोर धरू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत जनतेतून सरपंच निवड असल्याने साऱ्या जावळीकरांचे लक्ष लागले आहे.