शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जावळीत १७ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: July 13, 2017 14:56 IST

हालचाली गतिमान : केळघर, आनेवाडीचा समावेश

आॅनलाईन लोकमतमेढा (जि. सातारा), दि. १३ : जावळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता होऊ घातलेल्या १७ ग्रामपंचायतींवर थेट सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे राजकीय वतुर्ळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. बालेकिल्ला म्हणून जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप उतरणार काय याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. या १७ ग्रामपंचायतींमध्ये केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी या राजकीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जावळी तालुक्यात केळघर, आनेवाडी, करहर, आखाडे, कुसुंबी, मोरघर, वालुथ, रामवाडी, सोमर्डी, घोटेघर, वाकी, रुईघर, नांदगणे, शिंदेवाडी, ओझरे, रिटकवली आदी १७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. हरकतींवर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

३ आॅगस्ट रोजी अंतर्गत प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. याबाबत हरकती ११ जुलैपर्यंत जावळी तहसील कार्यालयात स्वीकारण्यात आल्या आहेत.यावेळी प्रथमच नागरिकांमधून थेट सरपंचाची निवड होत असल्याने नागरिकांच्यातही उत्सुकता वाढली आहे. तालुक्यातील केळघर, कुसुंबी, आनेवाडी, अखाडे, करहर या महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण होणार? याबरोबरच ही निवडणूक पक्षीय स्तरावर होणार की गट-तटाची याबाबत जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे.

जावळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, शिवसेना व भाजपदेखील जोर धरू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत जनतेतून सरपंच निवड असल्याने साऱ्या जावळीकरांचे लक्ष लागले आहे.