शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जावळी प्रशासन झाले खडबडून जागे..!

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

बहिष्कार प्रकरण : मरडमुरे गावात ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन; सखोल चौकशी होणार

कुडाळ : मरडमुरे (ता. जावळी) गावातील आढाव कुटुंबाला वाळीत टाकल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेतली. तहसीलदार रणजित देसाई यांनी पोलिसांना गावातील ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेऊन या कुटुंबावर अन्याय झाला असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सामंजस्याने, शांततेत तोडगा काढून गावातील लोकांमधील समज-गैरसमज दूर करून शांतता टिकविण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.तालुक्यातील सामाजिक संघटनांनी या प्रकाचा निषेध केला आहे. अन्यायग्रस्त कुटुंब भीतीखाली असल्यामुळे आतापर्यंत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमुळे हे प्रकरण उजेडात आले. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मरडमुरे गावात शुकशुकाट जाणवला. ग्रामस्थ दबावाखाली जाणवले.दरम्यान, तहसीलदारांनी मुंबई मंडळाला गावी बोलावून दोन दिवसांत बैठक बोलाविली आहे. त्यानुसार मेढा, कुडाळ पोलिसांना ग्रामस्थांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)या प्रकरणाची सखोल चौकशी करून जर खरोखरच या कुटुंबावर अन्याय झाला असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. गावात समज-गैरसमज झाले असतील तर त्यासंदर्भात आम्ही ग्रामस्थांची बैठक घेणार आहोत. ग्रामस्थांमधील एकोपा कायम राहावा, शांतता-सुव्यवस्था राहावी या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यापुढे असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने पोलीस-जनतेतील सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.- विवेक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, मेढामरडमुरे येथे घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कसलीही तक्रार दाखल केलेली नाही. तरीदेखील कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. गावात शांतता राहावी, ग्रामस्थांनी गावात यापुढेही एकत्रित वावरावे, यासाठी मुंबई मंडळ, ग्रामस्थांची एकत्रित बैठक दोन दिवसांत घेतली जाणार आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडविला जाईल.- रणजित देसाई, तहसीलदार, जावलीगावागावात सत्ता मुंबई मंडळांचीच!जावली तालुका हा डोंगररांगांनी वेढलेला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे डोंगरमाथ्यावर वसली आहेत. या गावांमधील बहुतांश नागरिक नोकरीनिमित्त मुंबईत राहतात. वर्षातून एकदा ग्रामदैवतांच्या यात्रेला ही मंडळी गावाकडे येतात. अशा गावांमध्ये मुंबईस्थित मंडळींचीच सत्ता पाहायला मिळते. त्यांचाच शब्द प्रमाण मानून गावचे राजकारण, समाजकारण चालते. गावात ग्रामपंचायत असली, तरी गावातील बहुतांश निर्णय मुंबई मंडळच घेते, असेच चित्र गावागावात पाहायला मिळते.नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहणाऱ्या मंडळींकडून गावचा गावगाडा चालतो. कोणतीही निवडणूक असली तरी निर्णय मुंबईतच घेतला जातो. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत, गावचा सरपंच कशासाठी, असाच प्रश्न डोंगरमाथ्यावरील गावांत राहणाऱ्यांना पडल्याखेरीज राहत नाही. तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते. गावाच्या विरोधात विशेषत: या मुंबईकर मंडळींच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीविरोधात एखादा ग्रामस्थ गेल्यास त्याला वाळीत टाकण्यापर्यंत निर्णय घेण्याचे धाडस ही मंडळे करतात आणि त्यांचा निर्णय ग्रामस्थांना निमूटपणे ऐकावा लागतो.मरडमुरा येथे घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. लोकशाही मानणाऱ्या देशात वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील, तर अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे, अशा तीव्र शब्तांत तालुक्यातील सामाजिक संघटनांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमावरून वृद्ध दाम्पत्यासह कुटुंबाला वाळीत टाकले जात असेल आणि पोलीस प्रशासनाला खबरही लागत नसेल, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटू लागले आहे.