शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जांबचे सहा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By admin | Updated: September 11, 2015 00:43 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल : निवडणुकीचा हिशेब न दिल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च न दिल्याचा फटका अपात्र सदस्यांना बसला आहे. नंदा बाळकृष्ण शिंदे, राजेंद्र बबन घोरपडे, कविता दशरथ घाडगे, राणी शरद घोरपडे, साधना बाळासो लोंढे, दस्तगीर निजाम मुलाणी (सर्व रा. जांब खुर्द) अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत. जांब खुर्द ग्रामपंचायतीमधील सात जागांपैकी सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी जांब खुर्द येथील विवेक प्रदीप शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत अपात्र ठरलेल्या सदस्यांनी २३ आक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला नाही, त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख (१) अन्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे म्हटले होते. दरम्यान, या संदर्भाने अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना नोटिसा काढून ८ जून २०१५ ही सुनावणीची तारीख ठेवली. दोन्ही बाजूंचे वकीलपत्र दाखल करून घेण्यात आले होते. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यापैकी नंदा शिंदे, राजेंद्र घोरपडे, कविता घाडगे, साधना लोंढे यांनी आपले लेखी म्हणणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. उर्वरित राणी घोरपडे, दस्तगीर मुलाणी यांना संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. ज्यांनी म्हणणे सादर केले ते समर्थनीय नसल्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याच्या निष्कर्षाप्रत आल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी या प्रकरणात निकाल देऊन सहा सदस्यांना अपात्र ठरविले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित माने, अ‍ॅड. भय्यासाहेब जगदाळे व अ‍ॅड. सतीश कदम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) अपात्र सदस्यांवर पाच वर्षे निर्बंध अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या या सहा ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना आता पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. आणखी एकाचा ‘स्वाइन’मुळे मृत्यू सातारा : जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या साथीने सहावा बळी घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना माण तालुक्यातील एका रुग्णाचा झालेला मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला असल्याचे वैद्यकीय अहवालातून दिसून आले आहे. आनंद दगडू जगदाळे (वय ४०, रा. डांगिरेवाडी, ता. माण) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी (दि. ८) जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, त्यात हा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचा निष्कर्ष आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण उपचार घेत असून, पाच संशयितांना उपचारांसाठी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)