शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जांबचे सहा ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By admin | Updated: September 11, 2015 00:43 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल : निवडणुकीचा हिशेब न दिल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिला आहे. निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च न दिल्याचा फटका अपात्र सदस्यांना बसला आहे. नंदा बाळकृष्ण शिंदे, राजेंद्र बबन घोरपडे, कविता दशरथ घाडगे, राणी शरद घोरपडे, साधना बाळासो लोंढे, दस्तगीर निजाम मुलाणी (सर्व रा. जांब खुर्द) अशी अपात्र ठरलेल्या सदस्यांची नावे आहेत. जांब खुर्द ग्रामपंचायतीमधील सात जागांपैकी सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. याप्रकरणी जांब खुर्द येथील विवेक प्रदीप शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत अपात्र ठरलेल्या सदस्यांनी २३ आक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत निवडणुकीतील खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला नाही, त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख (१) अन्वये त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे म्हटले होते. दरम्यान, या संदर्भाने अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना नोटिसा काढून ८ जून २०१५ ही सुनावणीची तारीख ठेवली. दोन्ही बाजूंचे वकीलपत्र दाखल करून घेण्यात आले होते. या प्रकरणात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यापैकी नंदा शिंदे, राजेंद्र घोरपडे, कविता घाडगे, साधना लोंढे यांनी आपले लेखी म्हणणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. उर्वरित राणी घोरपडे, दस्तगीर मुलाणी यांना संधी देऊनही त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. ज्यांनी म्हणणे सादर केले ते समर्थनीय नसल्याचे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याच्या निष्कर्षाप्रत आल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी या प्रकरणात निकाल देऊन सहा सदस्यांना अपात्र ठरविले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजित माने, अ‍ॅड. भय्यासाहेब जगदाळे व अ‍ॅड. सतीश कदम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) अपात्र सदस्यांवर पाच वर्षे निर्बंध अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या या सहा ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना आता पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. आणखी एकाचा ‘स्वाइन’मुळे मृत्यू सातारा : जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या साथीने सहावा बळी घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना माण तालुक्यातील एका रुग्णाचा झालेला मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला असल्याचे वैद्यकीय अहवालातून दिसून आले आहे. आनंद दगडू जगदाळे (वय ४०, रा. डांगिरेवाडी, ता. माण) असे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी (दि. ८) जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या रक्ताचा नमुना तपासणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, त्यात हा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाल्याचा निष्कर्ष आहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण उपचार घेत असून, पाच संशयितांना उपचारांसाठी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)