शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जेटलींचे सराफांविरोधी धोरण उफराटे: साखरियॉ

By admin | Updated: March 4, 2016 00:58 IST

अर्थमंत्री जेटली यांनी एक प्रकारचे उफराट्या कायद्याचे धोरण मांडले आहे,’ राज्य सराफ महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष साखरियॉ

कऱ्हाड : ‘केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतातील सराफ व्यावसायिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर नवीन कर लावले आहेत. अर्थमंत्री जेटली यांनी एक प्रकारचे उफराट्या कायद्याचे धोरण मांडले आहे,’ असा आरोप राज्य सराफ महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष साखरियॉ यांनी केला. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकारपरिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुरसाळे, भाजप युवा मोर्चाचे विष्णू पाटसकर, शुभम पाल आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी, कर्मचारी व सराफ व्यावसायिक उपस्थित होते.साखरियॉ म्हणाले, ‘नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील सराफांच्या धोरणांच्या निषेधार्थ आॅल इंडिया सराफ संघटनेने तीन दिवसांचा लक्षणिय बंद पुकारलेला आहे. त्यास शहरातील कऱ्हाड सराफ-सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने तीन दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारत आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सराफ व सुवर्णकार व्यापाऱ्यांवर भारतात तीस वर्षांनंतर प्रथमच अबकारी कर एक टक्का प्रस्तावित केला आहे. दोन लाखांच्यावर खरेदी करणाऱ्या दागिन्यांवर ग्राहकाने स्वत:ची ओळख सराफांना देण्यास बंधनकारक केले आहे. प्रस्तावित करात प्रति महिना १२ लाख रुपयांपर्यंत ज्यांचे व्यवहार असतील त्यांनी अबकारी खात्याकडे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया अत्यंत जाचदायक आहे. नोंदणीनंतर अबकारी खात्याला अमर्याद असे अधिकार बहाल होणार आहेत. सराफांवर अवलंबून असलेले सुवर्णकार व गलई कामगार यांची भारतात ४० लाख इतकी संख्या असून, त्यांच्यात प्रचंड बेरोजगारी पसरण्याचे काम या करामुळे होणार आहे. दोन लाखांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सराफाने नि:शुल्क, ग्राहकांची माहिती गोळा करून सरकारला द्यावी, असे आदेशाद्वारे नमूद केले आहे. त्यात चूक झाल्यास सरांफांना शिक्षा, दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. याबाबत पुणे येथे शुक्रवारी राज्य सराफ संघटनेची बैठक होणार असून, त्यात पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष साखरियॉ यांनी दिली. तसेच भाजप हे व्यापार विरोधी सरकार आहे. त्यामुळे भारतातील सराफ व्यावसायिकांना व कर्मचाऱ्यांना मोठा तोटा होणार आहे. त्याचा निषेध म्हणून भारतातील सराफांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यास कऱ्हाडमधीलही सराफ असोसिएशनच्या वतीने सहभाग घेतला असून, शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)