शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

‘जय जवान’ चा नारा नेरवर घुमला

By admin | Updated: April 26, 2016 00:22 IST

खटाव तालुका : दुष्काळग्रस्त किसानांच्या मदतीला भारतीय जवान दाखल; तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

पुसेगाव : ‘जय जवान जय किसान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत खटाव तालुक्यातील नेर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या डोजरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी केला. खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भारतीय जवान दाखल झाले असून, त्यांच्या हाताला हात लावण्यासाठी शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब यांच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या बाँम्बे सेपर्स विभागाचा एक डोजर, नायक दर्शन खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे नेर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जय जवान जय किसान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गोडसे, निवृत्त कर्नल राजेंद्र घाडगे, सुजित आंबेकर, संजय बोराटे, विद्याधर ताटे, विजय ताटे, विलासराव घाडगे, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘१८७२ ला नेर तलावाची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून आजतागायत या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब आणि भारतीय सैन्यदल यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या तलावातील गाळ काढल्यामुळे निश्चितच पाण्याचा साठा वाढेल. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकावा, शेतामध्ये सुपीकता वाढेल. परिणामी शेती उत्पादनात वाढ होईल. भारतीय सैन्यदल आपल्या मदतीसाठी आले असून, त्यांच्या या कामामध्ये आपणही सर्वजण सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी या तलावातून काढण्यात येणारा गाळ विनामूल्य आपल्या स्वत:च्या वाहनातून घेऊन जावा.’ असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. जिल्हाधिकारी मुदगल यांनी नायक खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार नितीन गायकवाड यांचा सत्कार केला. (वार्ताहर) शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोडसे म्हणाले, ‘नेर तलावातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रीन थंबचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. भारतीय सैन्य दलाला ज्यावेळी जवानांची गरज लागली त्यावेळी या गावातून, परिसरातून मोठ्या प्रमाणात जवान सैन्य दलात दाखल झाले. आज हे जवान निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी नेर तलावातील गाळ काढण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. परिसरातील सर्व शेतकरी, निवृत्त जवान, युवावर्ग यांनी या कामामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’