शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

‘जय जवान’ चा नारा नेरवर घुमला

By admin | Updated: April 26, 2016 00:22 IST

खटाव तालुका : दुष्काळग्रस्त किसानांच्या मदतीला भारतीय जवान दाखल; तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

पुसेगाव : ‘जय जवान जय किसान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत खटाव तालुक्यातील नेर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या डोजरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी केला. खटाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भारतीय जवान दाखल झाले असून, त्यांच्या हाताला हात लावण्यासाठी शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब यांच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलाच्या बाँम्बे सेपर्स विभागाचा एक डोजर, नायक दर्शन खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे नेर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दाखल झाले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जय जवान जय किसान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गोडसे, निवृत्त कर्नल राजेंद्र घाडगे, सुजित आंबेकर, संजय बोराटे, विद्याधर ताटे, विजय ताटे, विलासराव घाडगे, शिवाजीराव पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘१८७२ ला नेर तलावाची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून आजतागायत या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब आणि भारतीय सैन्यदल यांच्या माध्यमातून गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या तलावातील गाळ काढल्यामुळे निश्चितच पाण्याचा साठा वाढेल. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकावा, शेतामध्ये सुपीकता वाढेल. परिणामी शेती उत्पादनात वाढ होईल. भारतीय सैन्यदल आपल्या मदतीसाठी आले असून, त्यांच्या या कामामध्ये आपणही सर्वजण सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी या तलावातून काढण्यात येणारा गाळ विनामूल्य आपल्या स्वत:च्या वाहनातून घेऊन जावा.’ असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. जिल्हाधिकारी मुदगल यांनी नायक खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार नितीन गायकवाड यांचा सत्कार केला. (वार्ताहर) शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोडसे म्हणाले, ‘नेर तलावातील गाळ काढण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रीन थंबचे अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. भारतीय सैन्य दलाला ज्यावेळी जवानांची गरज लागली त्यावेळी या गावातून, परिसरातून मोठ्या प्रमाणात जवान सैन्य दलात दाखल झाले. आज हे जवान निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी नेर तलावातील गाळ काढण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. परिसरातील सर्व शेतकरी, निवृत्त जवान, युवावर्ग यांनी या कामामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’