शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू ...

सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि प्रशासनाने ब्रेक चेन ही मीहिम हाती घेतली. या मोहिमेमुळे पुन्हा एकदा व्यापारीवर्ग अडचणीत आला असून, घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. संपूर्ण लॉकडाऊनऐवजी शासनाने निर्बंध आणखी कठोर करावेत, अशी अपेक्षा आता व्यापारीवर्गातून होत आहे.

सातारा जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाकडून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला. यानंतर सर्व उद्योग व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले. अनेकांच्या कुटुंबाची गाडी कशीबशी रुळावर आली. दुकाने, व्यापार सुरू होऊन कुठे पाच-सहा महिने होत आहेत तोवर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि शासनाने लॉकडाऊनचा पर्याय पुढे आणला.

या लॉकडाऊनची झळ व्यापारी, उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन इतकेच नव्हे, तर घरखर्च चालवायचा कसा असा प्रश्न अनेकांच्या पुढे उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत 'गळ्यातील चेन मोडायची वेळ आली आणि कसली ब्रेक द चेन' अशा भावना देखील व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय

(कोट)

कोरोना रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद करणे, लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आणखीन कठोर निर्बंध करावेत. दुकानांची वेळ कमी करावी. परंतु, ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावू नये.

- सुरेखा मोरे, शाहूपुरी

(कोट)

पहिल्या टप्प्यात दुकाने पाच ते सहा महिने सुरू राहिली. यानंतर पुन्हा एकदा शासनाने कठोर निर्बंध लागू केले. त्यामुळे आमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. देणी भागवायची कशी, हा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.

- नीलिमा पाटील, सातारा

(कोट)

शासनाने दुकानांवर वेळेचे बंधन ठेवावे. मात्र, अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. हजारो कुटुंबीयांचे हातावरचे पोट आहे. आता व्यवसायच बंद झाल्याने पुन्हा एकदा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

- भारती आगवणे, विलासपूर

(चौकट)

सात महिने सुरू राहिला व्यवसाय

कर्ज कसे फेडायचे ?

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जवळपास सात महिने जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू राहिली. या कालावधीत उसनवारी घेतलेले पैसे, बँकांचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार सर्व देणी हळूहळू भागविली. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने बिकट बनली आहे. आता छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांची गाडी कधी रुळावर येणार? हा मोठा प्रश्न आहे, असे मत एका व्यापाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.

(चौकट)

२१० दिवस जिल्ह्यात सुरू राहिली दुकाने.