शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू ...

सातारा : पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल होऊन व्यवसाय कुठे सुरू होतो न होतो तोच पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि प्रशासनाने ब्रेक चेन ही मीहिम हाती घेतली. या मोहिमेमुळे पुन्हा एकदा व्यापारीवर्ग अडचणीत आला असून, घरखर्च चालवायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. संपूर्ण लॉकडाऊनऐवजी शासनाने निर्बंध आणखी कठोर करावेत, अशी अपेक्षा आता व्यापारीवर्गातून होत आहे.

सातारा जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाकडून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आला. यानंतर सर्व उद्योग व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले. अनेकांच्या कुटुंबाची गाडी कशीबशी रुळावर आली. दुकाने, व्यापार सुरू होऊन कुठे पाच-सहा महिने होत आहेत तोवर पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला आणि शासनाने लॉकडाऊनचा पर्याय पुढे आणला.

या लॉकडाऊनची झळ व्यापारी, उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन इतकेच नव्हे, तर घरखर्च चालवायचा कसा असा प्रश्न अनेकांच्या पुढे उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत 'गळ्यातील चेन मोडायची वेळ आली आणि कसली ब्रेक द चेन' अशा भावना देखील व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय

(कोट)

कोरोना रोखण्यासाठी सर्व दुकाने बंद करणे, लॉकडाऊन करणे हा पर्याय नाही. शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आणखीन कठोर निर्बंध करावेत. दुकानांची वेळ कमी करावी. परंतु, ब्रेक द चेन म्हणत लॉकडाऊन लावू नये.

- सुरेखा मोरे, शाहूपुरी

(कोट)

पहिल्या टप्प्यात दुकाने पाच ते सहा महिने सुरू राहिली. यानंतर पुन्हा एकदा शासनाने कठोर निर्बंध लागू केले. त्यामुळे आमची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. देणी भागवायची कशी, हा प्रश्न आता भेडसावू लागला आहे.

- नीलिमा पाटील, सातारा

(कोट)

शासनाने दुकानांवर वेळेचे बंधन ठेवावे. मात्र, अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. हजारो कुटुंबीयांचे हातावरचे पोट आहे. आता व्यवसायच बंद झाल्याने पुन्हा एकदा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

- भारती आगवणे, विलासपूर

(चौकट)

सात महिने सुरू राहिला व्यवसाय

कर्ज कसे फेडायचे ?

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जवळपास सात महिने जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू राहिली. या कालावधीत उसनवारी घेतलेले पैसे, बँकांचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार सर्व देणी हळूहळू भागविली. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने बिकट बनली आहे. आता छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायांची गाडी कधी रुळावर येणार? हा मोठा प्रश्न आहे, असे मत एका व्यापाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले.

(चौकट)

२१० दिवस जिल्ह्यात सुरू राहिली दुकाने.